Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur : समृद्धीसाठी चौपट मोबदला; नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी का नाही? कोल्हापूरच्या नेत्यांचा पालकमंत्र्यांना सवाल

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गासाठी जमिनीला बाजारभावाच्या चौपट मोबदला देण्यात आला. परंतु, नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना फक्त दुप्‍पटच मोबदला का?

sandeep Shirguppe

Kolhapur Politics : समृद्धी महामार्गासाठी जमिनीला बाजारभावाच्या चौपट मोबदला देण्यात आला. परंतु, नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना फक्त दुप्‍पटच मोबदला का? कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जमिनीच्या मोबदल्यात चौपट भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने आणि चंद्रदीप नरके यांनी केली. यावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून पाठवण्याचे आश्वासन दिले.

आमदार राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांनी महापालिकांच्या शाळांचा विषय उपस्थित केला. महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा, अशी मागणी केली. यावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे आणि शिवाजी पाटील यांनी अमली पदार्थांचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्याच्या सीमाभागातून अमली पदार्थ येतात. हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. इचलकरंजी येथे हद्दपार असणारे गुंड शहरात दिसतात. त्यांच्याकडूनच गांजा विक्री होते. अशी तक्रार तिन्ही आमदारांनी केली. यावेळी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले, "जे तडीपार आहेत ते त्यांच्या न्यायालयीन सुनावणीसाठी आले असल्याचे कळते. गांजा विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहोत. यापुढेही कारवाई सुरूच राहील." अशी माहिती पंडित यांनी दिली.

पालकमंत्र्यांना पत्रकारांचे वावडे का?

देशातील लोकसभा, विधानसभा अधिवेशनांचे सभागृहात उपस्थित राहून वार्तांकन केले जाते. महापालिका, जिल्हा परिषद यांच्या सर्वसाधारण सभांनाही पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. असे असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाच पत्रकारांना अटकाव केला जातो. सभागृहाबाहेर ‘सदस्यांशिवाय कोणाला परवानगी नाही’ असा फलक लावलेला असतो. मग मंत्र्यांचे स्वीय सचिव, प्रमुख कार्यकर्ते, सोशल मीडिया टीम सभागृहात कशी उपस्थित राहते? त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्रकारांचे वावडे आहे का? असा सवाल उपस्थित होतो. पूर्वी पत्रकारांना आतमध्ये बसू दिले जायचे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून बसू दिले जात नाही.

प्रशासन गतिमान करण्यासाठी सहपालकमंत्री

सहपालकमंत्र्यांबाबत विचारले असता, पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘प्रशासनाला अधिक गतिमान करण्यासाठी सहपालकमंत्री दिले आहेत. मंत्री माधुरी मिसाळ आणि मी पहिल्यापासून युतीमध्ये आहोत. त्यामुळे गेली दहा वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. समन्वयाने आणि परस्पर संमतीनेच आम्ही जिल्ह्याच्या विकासाचे निर्णय घेऊ. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT