Animal Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Fodder : शेतकऱ्यांचे चारासंकट टळले

Team Agrowon

Mumbai News : पावसामुळे शेतकऱ्याने भातपेरण्या आणि इतर शेती मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पाऊस मात्र अनियमित बरसत आहे. असे असले तरी गुरांना चरण्यासाठी माळरानावर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उगवला असल्याने शेतकऱ्यांचे चारा संकट टळले आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात मिरगाच्या पावसाने दमदार सलामी दिल्याने बळीराजा सुखावला होता. शहापूर तालुक्यातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनी भातबियाणे व अन्य खरीपाची पेरणी केली. उर्वरित ८५ ते ९० टक्के शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पाऊस पडल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये, असे वारंवार कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत होते.

त्यामुळे काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. गुरांना चरण्यासाठी माळरानावर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उगवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चारा संकट मात्र टळले आहे.

अनेक महिन्यांपासून कोरडा चारा खाल्लेल्या गुरांना पावसाळ्यात हिरवा चारा दिसल्यानंतर ते अति प्रमाणात खातात. अशाने गुरांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. जंतू संसर्ग होऊ नये, म्हणून दवाखान्यातून जंतू निर्मूलन लस देऊन पशुधन जोपासावे.
डॉ. तृप्ती कुलकर्णी, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, शहापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT