Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शेतकऱ्यांचा सामुदायिक जलसमाधीचा इशारा

Team Agrowon

Nanded News : कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीचे संचालकास अटक करुन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाची रक्कम देण्यात यावी अन्यथा अन्यायग्रस्त शेतकरी नांदेड येथील गोदावरी नदीपात्रात सामुदायिक जलसमाधी घेणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

मुंबई येथे मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीने १२०० शेतकऱ्यांचा हरभरा, सोयाबीन, हळद आदी शेतमाल २०२०- २१ मध्ये खरेदी केला होता.

या शेतकऱ्यांचे २१ कोटी रुपये कंपनी देणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हक्काच्या रक्कमेसाठी अनेकदा कंपनीच्या विरोधात विविध प्रकारे आंदोलने केली. ता. १४ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

या आंदोलनाची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी कुंटूर पोलीस ठाण्यात ता. १८ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचे संचालक अजय कुमार बाहेती, अविनाश काबरा व नागोराव बांद्रे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन तब्बल चार महिने झाले आहेत.

शेतकऱ्याला फसवणाऱ्या गुन्हेगाराला अटक झाली नाही. दुसरीकडे अन्यायग्रस्त शेतकरी व कुटुंब तणावाखाली जीवन जगत आहेत. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीच्या संचालकाला तत्काळ अटक करावी व सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे, अन्यथा रयत क्रांती संघटना सर्व शेतकऱ्याला घेऊन नांदेडच्या गोदावरी पात्रामध्ये सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT