Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेतून परताव्यांची प्रतीक्षा

Crop Insurance Scheme : जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादक हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ मध्ये सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना कमी व अधिक तापमान आणि वादळ, गारपिटीत नुकसानीसंबंधीचे परतावे या महिन्यात मिळतील, असे संकेत होते. परंतु हे परतावे देण्याबाबत शासनाकडून कुठल्याही हालचाली नसल्याने केळी उत्पादकांत शासनाबाबत नाराजी वाढली आहे.

जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार केळी उत्पादक हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ मध्ये सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते. नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांसाठी केळी पिकाला थंडी, अधिक तापमान, वादळ (वेगाचा वारा), गारपीट या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळते.

विमा संरक्षण कालावधीत जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा या तालुक्यांत वादळ व गारपीट झाली. यासंबंधी विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर एक-दोन दिवसांत कंपनीला सूचना दिली. यानंतर पंचनामे झाले. विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारीदेखील पंचनाम्यांसाठी दाखल झाले होते.

विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावे देण्याचे या योजनेत निर्देशीत आहे. शासन व विमा कंपनीने थंडी व उष्णता यात नुकसानीसंबंधी परतावे या महिन्याच्या सुरुवातीला मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु शासनाकडून कोणतेही नियोजन झालेले नाही.

शेतकरी याबाबत मागण्या करीत असून, याबाबत तातडीने संबंधितांनी दखल घ्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामातील परताव्यांचा घोळ सुरूच आहे. असा घोळ यंदा करू नये व याच आठवड्यात परतावे पात्र शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kerala Assmbly : व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा योजना लागू करा; केरळ विधानसभेत ठराव मंजूर

Post Harvest Value Addition: कर्नाटकात भात पीक काढणीपश्चात मूल्यवर्धनाचं मॉडेल, चार-पाच पट अधिक उत्पन्नाची हमी

Rural Governance: गावगाड्याचा विकास कधीपर्यंत वाऱ्यावर?

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

SCROLL FOR NEXT