Farm Labor Shortage
Farm Labor Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Labor Shortage : तळोदा भागातील शेतकरी मजूरटंचाईने त्रस्त

Team Agrowon

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसनासह परिसरात रोजच्या वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, परिपक्व झालेल्या मुगाचे पीक काढणीसाठी शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने मळणीचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिकतेसह पारंपरिकता आजही कायम असल्याचा प्रत्यय येत आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणावर लग्नसराई सुरू असल्याने परिपक्व झालेल्या मुगाचे पीक काढण्यासाठी वेळेवर मजूर तसेच मळणीयंत्रही उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या उभी राहिली आहे.

मुगाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पारंपरिकतेचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जे मजूर मिळाले त्यांना सोबत घेऊन मुगाच्या शेंगांची तोडणी केली जात असून, लागलीच त्या शेंगा पसरवून वाळविण्यात येत असून, काही शेतकऱ्यांकडून बैलजोडीद्वारे शेंगांवर बैलगाडी फिरविण्यात येत आहे, तर काही शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर फिरविण्यात येत आहे.

पिकांची मळणी करण्यात येत आहे. मळणी केल्यावर मूग व फोलकटे वेगळे झाल्यावर वारा वाहत नसल्याने समस्या निर्माण होत असून, त्यामुळे दोन जण मोठी साडी आजूबाजूला लांब धरून उभे राहतात.

त्यांच्याकडून जोरजोराने साडी हलविण्यात येऊन वारा निर्माण करण्यात येतो व एका जणाकडून त्या साडीवर मूग व फोलकटाचे मिश्रण टाकण्यात येत आहे. त्यामुळे फोलकटे उडून जाण्यास मदत होत असून, मूग वेगळे होण्यास मदत होत आहे.

दरम्यान, शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला असला तरी ग्रामीण भागात असे दुर्मीळ चित्र आजही पाहावयास मिळत असल्याने याकडे कुतूहलाने पाहिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT