Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी : पटोले

Nana Patole : शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. २४) केली.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाला भाव नाही. शेतीला लागणारे बी-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत. कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. २४) केली.

पटोले म्हणाले, ‘‘राज्यात या वर्षी काही भागात कोरडा दुष्काळ, तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे, तर काही भागात अजून पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

बोगस खते बी-बियाण्यांचा सुळसुळाट आहे, पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करते. पीकविम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही तर पीकविमा कंपन्यांनाच मोठा फायदा होतो.

परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील ६ महिन्यांत राज्यात १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील शेतकऱ्याची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफीची गरज आहे.’’

‘‘महायुती सरकार लाडका बिल्डर, लाडका उद्योगपतींसाठीच काम करते. अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपये माफ करण्यासाठी पैसे आहेत. मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारने माफ केले, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांचे कर्जमाफ केले पाहिजे,’’ अशी मागणी पटोले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT