Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : नांदेडला पीकविमा परताव्याची प्रतीक्षाच ; स्थानिक नेसर्गिक आपत्ती, २५ टक्के अग्रिम, नमुना सर्व्हेअंतर्गत विमा परतावा बाकी

Crop Insurance Refund : सप्टेंबर २०२४ मधील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या अधिसुचनेनुसार २५ टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम, विमा कंपनीने केलेले नमुना (सॅम्पल) सर्व्हेसह स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकातअंतर्गत दाखल केलेल्या दाव्याबाबत परतावा अद्याप मिळाला नाही.

Team Agrowon

नांदेड : सप्टेंबर २०२४ मधील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या अधिसुचनेनुसार २५ टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम, विमा कंपनीने केलेले नमुना (सॅम्पल) सर्व्हेसह स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकातअंतर्गत दाखल केलेल्या दाव्याबाबत परतावा अद्याप मिळाला नाही. शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन, कृषी विभागाह विमा कंपनीकडून ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. परिणामी नुकसानग्रस्त शेतकरी विमा परताव्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात २०२४ मधील खरीप हंगामाता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिरायती, बागायती व फळपिकांचे पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांने ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या बाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत (मिड सिझन डव्हरसिटी) अधिसूचना लागू केली
होती.

त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी २५ टक्के परतावा देण्याचे निर्देशीत केले होते. परंतु विमा कंपनीकडून केंद्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन अधिसूचना जारी केलेला कालावधी व शेतकऱ्यांचे दावे या घटना एकाचवेळी येत असतील तर वैयक्तीक पंचनामा करण्याऐवजी ३५ टक्के नमुना सर्व्हे करण्याचा नियम लागू करून सर्व्हे केले आहेत.

यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत (मिड सिझन डव्हरसिटी) मिळणारा परतावा, विमा कंपनीने केलेले नमुना सर्व्हे तसेच स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा किती मंजूर आहे, याबाबत विमा कंपनी, जिल्हा प्रशासनाने अद्याप स्पष्ट केले नाही. पीकविमा मंजुरीबाबत जिल्हा समितीची बेठकही काही दिवसांपासून झाली नाही.

यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परताव्यासाठी विमा कंपनीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने विमा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेठक घेऊन निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विमा कंपनीला केंद्र तसेच राज्य सरकारकडून ३०९ कोटींचा हिस्सा मिळाला आहे. तर अद्याप ११८ कोटी प्रलंबित आहेत. यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध नुकसान घटकाअंतर्गत विमा परतावा मंजुरीची शक्यता आहे.
- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT