Pune News : खरीप हंगाम-२०२४ मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ९ मे पर्यंत ३ हजार १२६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आणखी ३०७ कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत. तर २८७ कोटी रुपये राज्य सरकारने पीकविमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम-२०२४ मधील वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरु आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई जमा केली जात आहे.
काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे.
शेतकऱ्यांना ९ एप्रिलपर्यंत ३ हजार ७२० कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. पण राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक अपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाईच शेतकऱ्यांच्या खात्यता जमा करत आहेत.
या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाई
३ हजार ४३३ कोटी रुपये आहे. त्यापैकी ९ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार १२६ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ३०७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.