Grape Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Vineyard Management : द्राक्षशेतीत जैविक व्यवस्थापन महत्त्वाचे

Grape Farming : द्राक्ष उत्पादनात कीड-रोग नियंत्रण करताना गरजेनुसार रासायनिक तर प्रामुख्याने जैविक व्यवस्थापन पद्धत फायदेशीर आहे.

Team Agrowon

Nashik News : द्राक्ष उत्पादनात कीड-रोग नियंत्रण करताना गरजेनुसार रासायनिक तर प्रामुख्याने जैविक व्यवस्थापन पद्धत फायदेशीर आहे. यामुळे खर्चात बचत होते शिवाय परिणाम चांगले येतात. कीटकनाशकांचे अवशेष प्रमाण कमी येतात. खर्च कमी करून गुणवत्ता वाढविण्यासाठी जैविक व्यवस्थापनाचे महत्त्व वाढत आहे, अशी माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुजोय सहा यांनी दिली.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (पुणे) आणि आईपीएल बायोलॉजिकल्स लिमिटेड यांच्याकडून ‘कीटकनाशकांच्या अवशेषांशी सुसंगत द्राक्ष उत्पादनासाठी रोग आणि किडीचे जैविक व्यवस्थापन’ या विषयावर कारसुळ (ता. निफाड) येथील कैलास पगार यांच्या शेतावर शुक्रवारी (ता. २१) प्रक्षेत्र भेट व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सहा बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, मावळे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संशोधन सल्लागार समिती सदस्य अरुण मोरे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक अनंत मोरे, शेतकरी आर. एन. वाटपाडे, गोविंदराव तडाखे आदी उपस्थित होते.

सहा म्हणाले, की द्राक्ष उत्पादनात रासायनिक अंश पातळी कमी करणे हे आव्हान आहे. या परिस्थितीत रासायनिक फवारण्या कमी करून जैविक घटकांचा वापर वाढविल्यास यावर मात करणे शक्य होत आहे. द्राक्ष पिकासाठी जैविक घटकांचा वापर महत्त्वाचा ठरतो आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्याच्या हेतुने रासायनिक नव्हे तर जैविक घटकांचा वापर करून परिणाम तपासण्यात आले. सुरुवातीला दोन वर्षांनंतर चांगले परिणाम समोर आले.

जैविक पद्धतीने व्यवस्थापन करताना रसायन वापराप्रमाणे तत्काळ परिणाम दिसून येत नाहीत. मात्र सातत्यपूर्ण वापरातून कामकाज झाल्यानंतर त्याचे सकारात्मक चांगले परिणाम येतात. त्यामुळे पूर्णपणे रासायनिक वापर सोडून नव्हे; मात्र अभ्यास वृत्तीने जैविक निविष्ठांचा वापर वाढता तर रसायनांची गरज लक्षात घेऊनच वापर करणे शहाणपणाचे आहे.

आमले म्हणाले, की द्राक्ष शेतीचा निव्वळ नफा कमी तर खर्च वाढतोय. त्यामुळे जैविक बाबींची जोड देण्याची गरज निर्माण झाली आहे. खर्च कमी करून गुणवत्ता वाढविण्यासाठी जैविक पद्धतींवर शेतकऱ्यांचा विश्वास वाढला पाहिले. आयपीएल बायोलॉजिकल्सचे डेव्हलपमेंट मॅनेजर अनिल चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार स्टेट हेड हेमेंद्र पाटील यांनी मानले. द्राक्ष उत्पादक शेतकरी मालोजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कैलास पगार यांचा सन्मान करण्यात आला.\

बदल स्वीकारण्याची गरज

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या निकषानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे स्थानिक बाजारपेठेत सुद्धा निकष लागू होणार आहेत. आगामी काळात बारकोड सहित उत्पादनांची विक्री केली जाईल त्यामुळे जैविक व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा येणाऱ्या काळात असेल. त्यामुळे बदल स्वीकारण्याची गरज आहे, असेही डॉ. सुजोय सहा यांनी या वेळी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT