Orange Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard Management : संत्रा बागांमध्ये बहरासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक

Orange Farming : पाटील यांनी सल्ला दिला, की संत्रा बागांमधून सातत्याने उत्पादन मिळवण्यासाठी बाग लागवडीपासून व्यवस्थापनाला सुरुवात होते.

Team Agrowon

Buldana News : संत्रा उत्पादनात दर्जा आणि सातत्याने उत्पन्न वाढवण्यासाठी मृग तसेच आंबिया, या दोन्ही बहरांमध्ये योग्य नियोजन व व्यवस्थापन अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्यातज्ञ निवृत्ती पाटील यांनी केले. ते सोनाळा (ता. संग्रामपूर) येथे आयोजित संत्रा उत्पादकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन बोलत होते.

सोनाळा येथील एगव्हेंचर्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि नवचैतन्य कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी (रिसोड) यांच्या वतीने संत्रा पीक लागवड ते विक्री व्यवस्थापन या विषयासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या वेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केव्हीकेचे विषय तज्ज्ञ शशांक दाते, मंजितसिंग शीख, अॅग्रोवनचे विभागीय प्रतिनिधी गोपाल हागे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील यांनी सल्ला दिला, की संत्रा बागांमधून सातत्याने उत्पादन मिळवण्यासाठी बाग लागवडीपासून व्यवस्थापनाला सुरुवात होते. रोप लावण्यासाठी योग्य व्यासाचा खड्डा, निरोगी रोपाची निवड, त्यानंतर बाग उत्पादनक्षम होईपर्यंत कुठली आंतरपिके घेणे परवडते किंवा नुकसानकारक असतात, बाग उत्पादनक्षम बनल्यानंतर झाडांची निगा, खत व्यवस्थापन, योग्य वेळी ताणावर सोडणे, या काळातील वाढ रोधकाची फवारणी, बागेला पाणी देण्याच्या पद्धती, खत मात्रा, मुळांचे संवर्धन अशा सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात.

बहर धरण्यासाठी व्यवस्थापन काटेकोरच करायला हवे. तसेच बागेत आधीच्या बहारातील फळांची तोडणी झाल्यानंतर लगेच खतमात्रा देत दुसऱ्या बहराची तयारी करावी लागते. या काळात एकही दिवस चालढकल करणे उत्पादकतेसाठी मारक ठरू शकते. बागांवरील खर्च कमी करून सेंद्रिय मात्रा, कंपोस्ट खत वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, शेतकरी गट तयार करून बागेची विक्री करताना करण्याचा सल्लाही पाटील यांनी या वेळी दिला.

आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे

सध्या मृग बहार धरण्यासाठी शेतकऱ्यांनी संत्रा बागा ताणावर सोडलेल्या आहेत. मात्र, या काळातच आता मॉन्सूनपूर्व पाऊस येत आहे. परिणामी काही ठिकाणी झाडांची ताणाची अवस्था निघून जाण्याची शक्यता वाढली आहे. जर जास्त पाऊस झाला असेल तर लगेच शेतकऱ्यांनी नियोजन करून बागेत व्यवस्थापनाची कामे सुरू करायला हवीत.

हा आठवडा बागांसाठी अत्यंत संवेदनशील काळ असल्याचेही ते म्हणाले. कार्यशाळेत शशांक दाते, मंजितसिंग शिख, कृष्णा मानवतकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संत्रा उत्पादक शेतकरी अजिंक्य तिडके यांच्यासह इतरांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT