Sugar Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Rate : मोदी सरकारच्या धोरणामुळे साखर कारखानदारीसह शेतकऱ्यांमध्ये कडवटपणा

Central Government : सरकारने जसे दरवाढीवर नियंत्रण आणले तसे केंद्राने दर घसरणीवरही लक्ष घालून साखरेच्या दर घसरणीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.

sandeep Shirguppe

Sugar Production : देशात साखरेच्या उत्पादनात वाढ झाल्याने साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आहे. दरम्यान याचा थेट परिणाम देशातील साखर कारखान्यांवर परिणाम झाला आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच साखरेचे दर ३,५५० ते ३,६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. आता, मात्र दरात १२५ ते १५० रुपयांची घसरण झाली आहे, शिवाय विक्रीही मंदावली आहे. दर घसरत चालल्याने साखर कारखान्यांचा आर्थिक डोलारा कोसळण्याची शक्यता आहे.

मागच्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणले. सरकारने जसे दरवाढीवर नियंत्रण आणले तसे केंद्राने दर घसरणीवरही लक्ष घालून साखरेच्या दर घसरणीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.

२०२३-२४ च्या साखर हंगामात २८० लाख टन साखरनिर्मिती देशात होईल, असा अंदाज बांधून साखर निर्यातीवर बंदी घालत कारखानदारांचे हात बांधले. साखरेच्या दराने प्रतिक्विंटल ३,५०० रुपयांची मर्यादा ओलांडताच ४५ लाख टन साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविण्याच्या स्वतःच्याच धोरणास सरकारने बंदी घातली.

दरम्यान यावर साखर कारखानदारांकडून विरोध झाल्याने सरकारने आपल्या धोरणात बदल करत १७ लाख टन साखर इथेनॉलनर्मितीकडे वळविण्याचा अंशतः दिलासा दिला. याशिवाय साखर विक्रीचे कोटे वाढविले आणि दर नियंत्रित ठेवले. आता, देशात ३१९ लाख टन साखरनिर्मिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक पातळीवर ब्राझीलचा साखरहंगाम चांगला चालला आहे. अशात साखरनिर्यातीवरील बंदी कायम असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या विक्रीला तर ब्रेक लागलाच आहे पण फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून साखरेच्या दरात घसरण सुरू आहे.

लहान साखर (एस ग्रेड) ३,५५० तर मोठी साखर (एम ग्रेड) ३,६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होता. 'सोमेश्वर'च्या आजच्या विक्रीत 'एस-२' साखरेला ३,३९० रुपये प्रतिक्विंटल तर 'एम' साखरेला ३,५६० रुपये दर मिळाला मात्र पुरेशी विक्री झाली नाही. काही गरजू कारखान्यांना यापेक्षा पन्नास रुपये कमी दर मिळाला.

साखरेचे उत्पादन वाढणार

झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. परिणामी गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर उताऱ्यात मोठी घट दिसून आली. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत साखर उतारा गेल्या वर्षी इतकाच अर्थात ९.८३ टक्के मिळाला आहे.

राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात वाढ होत असल्याने कारखानदारांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा गाळप हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT