Union Budget Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2023 : सरकार फक्त डिजीटल घोषणा करते का ?

अन्नसाठवण विकेंद्रीकरण, शेतीसाठी कर्जाचे उद्दीष्ट २० लाख कोटी इतके केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यासाठी बँकांना बांधिल कसे केले जाणार, याबाबतही काही उल्लेख आवश्यक होतात.

Dhananjay Sanap

सरकार फक्त करू, उभारू म्हणते. असाच केवळ घोषणांचा प्रकार मागील काळातही झाला आहे. मोठे रस्ते बांधले असले तरी त्याद्वारे कापूस (Cotton), केळी (Banana), पपई (Papaya) अशा पिकांच्या निर्यातीसाठीच्या वाहतुकीसाठी फायदा होतो का, हेही पाहिले गेले पाहिजे.

सेंद्रिय शेतीबाबत (Organic Farming) एक कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. मात्र, यातून रासायनिक खतांवरील अनुदान (Fertilizer Subsidy) कपातीला बळ देण्याचे काम सरकार करणार आहे. सेंद्रिय शेतीच्या मागे सर्व यंत्रणा, शेतकऱ्यांना गुंतून राहणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागेल.

अन्यथा भविष्यात शेतमाल उत्पादन कमी होऊन श्रीलंकेसारखी स्थिती होऊ शकते. अन्नसाठवण विकेंद्रीकरण, शेतीसाठी कर्जाचे उद्दीष्ट २० लाख कोटी इतके केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यासाठी बँकांना बांधिल कसे केले जाणार, याबाबतही काही उल्लेख आवश्यक होतात. हा अर्थसंकल्प पुढील निवडणुका लक्षात घेऊन आणला असावा, असे मला वाटते.

- किरण पाटील, नेते, रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटना, जळगाव

कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा निर्णय स्वागतार्ह- समीर मुळे

देशातील कृषी क्षेत्राची कामगिरी यावर्षी कमालीची चांगली राहिली आहे. धान्य उत्पादन सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भरडधान्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन तसेच छोट्या सहकारी संस्था निर्मितीसाठी सहाय्य, दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा, कृषीपूरक स्टार्टअपसाठी उपाययोजना तसेच फंड सहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठीच्या उपाययोजना, डाळीसाठी विशेष हब तयार करण्याचा तसेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा निर्णय चांगला आहे.

रासायनिक खतांमध्ये केमिकलचा वापर खूप होत आहे, त्याचा वापर कमी करून पर्यावरणपूरक खतांना प्रोत्साहन तसेच रासायनिक खताचा वापर कमी करण्याचा निर्णय चांगला आहे. बियाणे, कृषी विषयक आणि इतर उद्योगासाठी प्रोत्साहन व योग्य त्या वातावरणाची गरज असून सातत्याने निसर्गाच्या लहरींमुळे तसेच पूर्णपणे हवामानावर अवलंबून असणाऱ्या बियाणे उद्योगाला या अर्थसंकल्पाकडून खूप काही अपेक्षा होत्या.

परंतु यावर्षी पण काही सवलती किंवा सहाय्य जाहीर झाले नाही,परंतु आम्ही सकारात्मक आहोत. येणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात आमच्या बियाणे उद्योगांसाठी निश्चितचं काही फलदायी निर्णय, सहाय्य किंवा प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.

समीर पद्माकर मुळे अध्यक्ष, सियाम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT