Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit crop Insurance : ..तर दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील सुमारे ७७ हजार ५०० शेतकरी २०२२-२३ मध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकाच्या विमा संरक्षणासंबंधी सहभागी झाले. परंतु अद्याप कुणालाही एक दमडीही परतावा मिळालेला नसल्याने पीकविमाधारक आपले पशुधन, बैलगाड्या घेऊन दिवाळी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात साजरी करणार आहेत.

विमाधारक शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनास इशारा दिला असून, या आंदोलनात शेतकरी संघटना, भाजप व इतर राजकीय पक्षदेखील सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ८१ हजार ८१० हेक्टर एवढ्या क्षेत्रातील केळी पिकासंबंधी शेतकऱ्यांनी हेक्टरी १० हजार ५०० रुपये हप्ता भरून विमा संरक्षण घेतले होते. १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ या नऊ महिन्यांसाठी केळी पिकाला विमा संरक्षण होते.

हा विमा कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसात पात्र विमाधारकांना परतावे मिळणे अपेक्षित होते. परंतु योजनेत काही राजकीय पक्षांचे बगलबच्चे व शेतकरी विरोधकांनी तक्रारी व सातत्याने तक्रारींबाबत पाठपुरावा केला. यामुळे योजनेबाबत चौकशी, तपासणी, पीक पडताळणी सुरू झाली.

विमाधारकांनी केळीची लागवड केली आहे, की नाही याची पडताळणी करण्यासाठी मे २०२३ ची मुदत विमा कंपनीला कृषी विभागाने दिली होती. परंतु पडताळणी फक्त ४६ हजार हेक्टरवरील केळी पिकाबाबत झाली. सुमारे ३७ हजार हेक्टर क्षेत्राची पीक पडताळणीच झाली नाही.

घोळ वाढत असताना शेतकऱ्यांत रोष वाढला. पीकविमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबत १८ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन ई पीक पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून परतावे दिले जावेत, असा निर्णय घेतला. लागलीच २१ सप्टेंबर रोजी मुंबईत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विमा कंपनी, कृषी विभागाची बैठक झाली.

त्यात नागपूर येथील महाराष्ट्र रिमोड सेंसींग अॅप्लीकेशन सेंटर (एमआरसॅट) यांच्याकडून सॅटेलाईट इमेज घेऊन केळी पिकासंबंधी पडताळणी करावी, १० दिवसात त्याबाबत अहवाल देवून कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या होत्या. परंतु हा अहवाल आलाच नाही.

यासंदर्भात जिल्ह्यात विविध पक्षांनी आंदोलने, उपोषण केले. पण कृषी विभाग मनमानी करीत आहे. नुकतेच जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनीही याबाबत जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देवून आपली भूमिका सांगितली.

मंजूर अर्जही प्रलंबित करण्याचा प्रकार

जिल्ह्यात ४६ हजार हेक्टरवरील केळी पिकासंबंधी पडताळणी विमा कंपनीने केली. काही पंचनामेही केळी पिकाबाबत नुकसानीसंबंधी विमा कंपनी व कृषी विभागाने केले. यानंतर संबंधित विमाधारकांच्या विमा प्रस्ताव किंवा अर्जांना मंजुरी (अॅप्रूवल) दिल्याचे विमा कंपनीच्या पोर्टलवर दिसत होते.

परंतु एमआरसॅटच्या माहितीच्या आधारे कृषी विभागाने जी पडताळणी सुरू केल्यानंतर मंजूर अर्जही प्रलंबित (पेंडींग) दिसत आहेत. मंजूर अर्जही का प्रलंबित ठेवले जात आहेत, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत असून, कृषी विभागातील शेतकरी विरोधी अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार करीत असल्याचा संताप जिल्ह्यात व्यक्त केला जात आहे.

कृषी विभाग व विमा कंपनी फळ पीकविमा प्रश्नी मनमानी करीत आहे. मंजूर अर्जही आता प्रलंबित ठेवले जात आहेत. हा प्रकार अन्यायकारक व हुकूमशाहीसारखा आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे बरेवाईट केल्यास त्यास विमा कंपनी व कृषी विभाग जबाबदार राहील. येत्या १० दिवसात प्रश्न निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो विमाधारक धडकतील व दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयातच साजरी केली जाईल.
- उन्मेष पाटील, खासदार, जळगाव लोकसभा क्षेत्र
माझ्या विमा संरक्षित क्षेत्रात केळी होती, ती अजूनही आहे. त्यासंबंधी पडताळणी होवून माझा विमा प्रस्ताव किंवा अर्ज विमा कंपनीच्या पोर्टलवर मंजूर (अॅप्रूव्ह) दिसत होता. परंतु मागील दोन दिवसांपासून हा अर्ज प्रलंबित (पेंडींग) आहे, असा संदेश येत आहे. हकनाक शेतकऱ्यांना लक्ष्य केले जात असून, ही कृषी विभागातील व विमा कंपनीतील अपप्रवृत्ती शोधून कारवाई केली जावी. हा प्रकार गळचेपी करण्यासारखा आहे.
- किरण पाटील, शेतकरी, सनपुले, (ता.चोपडा, जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT