Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : फक्त आढावा; पाणी सोडण्यावर निर्णय नाही

Water Crisis : मराठवाड्यासाठी वरच्या धरणातून हक्काचे पाणी सोडण्यासाठी मंगळवारी (ता. १७) होणाऱ्या बैठकीकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, या बैठकीत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्याविषयी काहीच चर्चा झाली नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यासाठी वरच्या धरणातून हक्काचे पाणी सोडण्यासाठी मंगळवारी (ता. १७) होणाऱ्या बैठकीकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, या बैठकीत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्याविषयी काहीच चर्चा झाली नाही.

केवळ पाण्याची उपलब्धता, सिंचन, पिण्यासाठी किती पाणी लागेल, किती पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी उपलब्ध होऊ शकते याविषयी चर्चा करण्यात आली. ऑक्टोबर अखेरपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने जायकवाडी धरण यंदा निम्मेदेखील भरले नाही. दुसरीकडे नाशिक व नगर जिल्ह्यातील तब्बल डझनभर धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. यामुळे वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडले जावे, अशी मराठवाड्यातील जनतेकडून रास्त मागणी केली जात आहे. मात्र, वरच्या भागातील जिल्ह्यात यात खोडा घातला जात आहे.

त्यामुळे मराठवाड्यातील जनता आक्रमक झाली आहे. समन्यायी पाण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक भूमिका घेत चार दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. नाशिक, अहमदनगर या भागातून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी वेळ पडल्यास गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराही दिला. १५ ऑक्टोबरनंतर पाणी सोडणे अपेक्षित होते.

यासाठी मंगळवारी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या होणाऱ्या बैठकीतून पाणी सोडण्याबाबत काहीतरी ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीत याविषयी कसलीही चर्चा झाली नाही. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी फक्त तारीख जाहीर करून त्यावर अंमलबजावणी करायची आहे.

तातडीने वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले तर अधिक योग्य राहणार आहे. जसा उशीर होईल तसे पाणीवहनातच पाण्याचा झिरपणे व बाष्पीभवनामुळे व्यय होऊन प्रत्यक्षात धरणात कमी पाणी येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. या संदर्भात लवकरच पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भेटून पाणी सोडणे विषयी सद्यस्थिती जाणून घेणार असल्याचे पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT