Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी कालव्यासह भीमा-सीना जोड बोगद्यातून विसर्ग

Team Agrowon

Solapur News : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार शनिवारपासून (ता. ४) उजनीच्या कालव्यात व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. कालव्यातून एक हजार तर बोगद्यातून दोनशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला, रब्बी हंगामातही पेरण्यांचा टक्का घटला आहे. ऊस, फळबागा, चारा पिके यासह शेती व पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्याची मागणी सातत्याने होत होती.

त्यानुसार, उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सध्या एक हजार क्युसेकने पाणी सोडले जात असून हा विसर्ग तीन हजारांवर नेला जाणार आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सध्या दोनशे क्युसेकने पाणी सोडले जात असून हा विसर्ग नऊशेपर्यंत नेला जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

उजनीतून कालव्यात जवळपास आठ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. बोगद्यातून साडेतीन ते चार टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. उजनीत सध्या ५४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

डिसेंबरमध्ये उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. यंदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा अशी अपेक्षा सर्वच स्तरामधून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT