Political Parties Manifesto Agrowon
ॲग्रो विशेष

Political Parties Manifesto : महायुती, महाविकाससह वंचितच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना महत्व; पाहा कोणती आहेत आश्वासने?

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता रंग चढत असून महायुती, महाविकाससह वंचितने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान विविध पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुती, महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, युवक मध्यस्थानी असल्याचे समोर आले आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत यंदाची निवडणूक होणार आहे. तर यावेळी वंचितसह तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. यादरम्यान राज्यात शेतकऱ्यांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवरून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.

महायुतीचा जाहीरनामा

महायुतीने कोल्हापूरच्या सभेत प्रचाराचा शुभारंभ करताना जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये लाडकी बहीण योजनेसह शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात भरीव वाढ करण्याची घोषणा केली. या योजनेतून आता शेतकऱ्यांना १२ हजार ऐवजी १५ हजार दिले जातील अशी घोषणा त्यांनी केली. याचबरोबर राज्यातील ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते केले जातील, शेत मालाच्या एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्यासह वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर दिली जाईल अशी घोषणा केली.

महाविकास आघाडीची पंचसूत्री

महाविकास आघाडीकडून बुधवारी (ता.६) जाहीरनाम्यातून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. यात देखील शेतकऱ्याला महत्व देण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कृषी समृद्धी योजना लागू करू अशी घोषणा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली. तर या योजनेतून शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

अजित पवार यांच्या जाहीरनाम्यात बोनस

यादरम्यान अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वेगवेगळे स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले. अजित पवार गटाने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करताना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली. शिवाय ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

वंचितच्या जाहीरनाम्यात हमीभाव कायदा

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी, सोयाबीन आणि कापूस वेचणी करणाऱ्यां मजुरांना पाच हजार रुपये प्रति किलो वेचणी अनुदान, शेतमाल हमीभाव कायदा करण्यासह भाजीपाला, फळ, दूध आणि सर्व पिकांसाठी हमीभाव देवू असे म्हटले आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करू असेही आश्वासन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT