Maharashtra Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Monsoon Assembly: कृत्रिम फुलांवरील बंदीबाबत आठवड्यात निर्णय

Plastic/Artificial Flowers Ban : राज्यात अनेक महिन्यांपासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्याचे थेट पडसाद सोमवारी (ता. ७) पावसाळी अधिवेशनात उमटले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यात अनेक महिन्यांपासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्याचे थेट पडसाद सोमवारी (ता. ७) पावसाळी अधिवेशनात उमटले. कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी विधानसभेत अनेक आमदारांकडून करण्यात आली असून याप्रश्नी अधिवेशन संपण्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहात केली.

दरम्यान या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कृषिमंत्री आणि कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी जोरदार टीका केली. आमदार महेश शिंदे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सोमवारी विधानसभेत उपस्थित केली होती. या बाबत महेश शिंदे म्हणाले की, राज्यात अनेक समारंभात, लग्नकार्यात, मंदिरांमध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे.

त्यामुळे फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी शिंदे यांनी केली. या वेळी आमदार कैलास पाटील, नाना पटोले, नारायण कुचे यांनी कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी केली. दरम्यान, कार्यक्रमात नैसर्गिक फुलांचा वापर अनिवार्य करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी या संदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सभागृहात दिली. या बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, इतर आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येईल. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असेही गोगावले यांनी या वेळी स्पष्ट केले. या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, यानुसार नियोजन केले जाईल, असेही गोगावले यांनी या प्रसंगी सांगितले.

कृषिमंत्र्याच्या अनुपस्थितीवर पटोलेंचा निशाणा

या प्रश्नाच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अनुपस्थितीवरून राज्य सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. आठवड्याभरापासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात शेतकऱ्यांबाबत चर्चा असताना कृषिमंत्रीच अनुपस्थित असल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला.

कृषिमंत्री अनुपस्थित आहेत त्यांची जाहिरात द्यायची आहे का? असा खोचक टोलाही लगावला. कृत्रिम फुलांचा प्रश्नासंदर्भात कृषिमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते, या बाबतही पटोले यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र फुलांच्या संदर्भातील प्रश्न असल्याने सोमवारी सकाळीच तो फलोत्पादन मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आल्याचे स्पष्टीकरण या वेळी तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी दिल्यानंतर त्यावर पडदा पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT