Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची चेष्टा करतायत; अंबादास दानवेंची सरकारवर टीका

Team Agrowon

Ambadas danve : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर किरकोळ रक्कम जमा करून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मात्र सरकार त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याची घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, असेही दानवे म्हणाले.

अवकाळीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान राज्यात झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा सरकार मदत करेल अशी आहे. परंतू सरकार केवळ घोषणा करते. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, असेही दानवे म्हणाले.

खरीपात नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर ६५, १०० रुपये जमा करण्याचे प्रकार राज्यात घडले होते. त्यावरून दानवे यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांच्या गलथान कारभाराची पोलखोल केली.

"शेतकऱ्यांना १ हजार रुपयांच्या खाली विमा रक्कम देता येत नाही, असा नियम असूनही विमा कंपन्या किरकोळ रक्कम देऊच कसे शकते? सरकार अशा कंपन्यांवर कारवाई का करत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

राज्यात ५ विमा कंपन्या काम करत आहेत. परंतू शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा मिळत नाही. सरकार या कंपन्यांवर कारवाई करत नाही, त्यामुळे आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, असल्याची खंतही दानवे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बीड पॅटर्नची राज्य सरकारची मागणी केंद्र सरकारने का पूर्ण केली नाही? असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या निर्णयावर शंका घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT