Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पिकांचे नुकसान ८८ हजार हेक्टरवर

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळ व काही ठिकाणी तुरळक गारपिटीने २६ नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान जवळपास ८८ हजार ५८५ हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान केले आहे, अशी माहिती प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून पुढे आली आहे.

प्रशासनाच्या पहिल्या प्राथमिक अहवालानुसार, २७ नोव्हेंबरला मराठवाड्यातील ४७ हजार १०९ हेक्टरवरील पिकांना दणका बसला होता. २९ नोव्हेंबरला दुसऱ्या प्राथमिक अहवालानुसार, नुकसानीचे क्षेत्र ६० हजार १५८ हेक्टरवर पोहोचले. पाहिल्या अंदाजात अतिवृष्टी झालेल्या जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील नुकसानीचा समावेश नव्हता.

दुसऱ्या प्राथमिक अंदाजात जालना जिल्ह्यातील नुकसानीचा समावेश झाला. तर आता शुक्रवारी (ता. १) देण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांतील नुकसान झालेल्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, लातूर या पाच जिल्ह्यांतील ६२६ गावांत पाऊस व गारपिटीमुळे जवळपास ८८ हजार ५८५.७६ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५०९ गावांत सर्वाधिक जवळपास ७३ हजार ९६७ हेक्टरवर झाले आहे. यामध्ये जिरायत ५२ हजार ४३६ हेक्टर, बागायत १३ हजार २३४ हेक्टर, तर फळपिकांचे जवळपास ८ हजार २९७ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील ७५ गावातील ५३३.३६ हेक्टर जिरायत, ६६ हेक्टर बागायत व ९३ हेक्टर फळपिकांचे मिळून ६९२.३६ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील १४ गाव-शिवारांतील ६३१.७ हेक्टर जिरायत पिकांचे नुकसान झाले.

लातूर जिल्ह्यातील तेरा गावांतील २२६.६० हेक्टर जिरायत १९.२० हेक्टर बागायत मिळून २४५.८० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. तर जालना जिल्ह्यातील १५ गाव शिवारातील २९३८ हेक्टर जिरायत ६ हजार ६२३ हेक्टर बागायत, तर ३ हजार ४८८ हेक्टर फळ पिके मिळून १३०४९ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.

२१६ जनावरांचा मृत्यू

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील १५७ लहान दुधाळ, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर धाराशिव या जिल्ह्यांतील ३५ मोठ्या दुधाळ जनावरांसह १६ मोठ्या व लहान ८ जनावरांचा समावेश आहे.

दोन व्यक्तींचा मृत्यू; ४५ घरांची पडझड

अवेळी पावसादरम्यान हिंगोली व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एका व्यक्तीचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला, तर हिंगोली जिल्ह्यातील दोन व्यक्ती जखमी झाल्या याशिवाय ३१ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली. तर १४ झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या. याशिवाय आठ गोठ्यांचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT