Jana News : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक स्रोतांची दर महिन्याला तपासणी करण्यात येते. मार्च महिन्यात ९८४ पैकी ८७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये अंबड तालुक्यातील सर्वाधिक ४४ गावांचे पाणी नमुने दूषित; तर बदनापूर, घनसावंगी व जालना तालुक्यात एकही पाणी नमुना दूषित नसल्याचे आढळले.
आरोग्य विभागाकडून दर महिन्याला ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची तपासणी केली जाते. यामध्ये ज्या गावांतील पाणी पिण्याजोगे आहे, अशा गावांना हिरवे कार्ड, तर पिण्याजोगे पाणी नसलेल्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते. मार्च महिन्यात जिल्ह्यातील ८७ अशी गावे आढळून आली आहेत.
जेथील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये अंबड ४४, भोकरदन ८, जाफराबाद १, मंठा २०, परतूर १४ गावांचे पाणी नमुने दूषित आहेत. तर बदनापूर, घनसावंगी व जालना तालुक्यात एकही नमुना आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
आरोग्य विभागाकडून घेतली जाते काळजी
दर महिन्याला जिह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक स्रोतांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात येते. यामध्ये स्रोतांचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी जल सुरक्षारक्षकामार्फत ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करण्यात येतो.
ज्या ठिकाणचे पाणी नमुने तपासणीनंतरही दूषित आढळले तर पुन्हा पाणी स्वच्छ करण्यावर भर दिला जातो. तसेच काही गावांत मोठे जार प्लांट असतील तर त्यांना सूचना देऊन पाणी तपासणी करण्यात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.