Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : ‘गुणनियंत्रण’मधील सावळागोंधळ उघड

Department Of Quality Control : कठोर नियम दाखवून बदल्यांमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या छळ करणाऱ्या कृषी विभागाने गुणनियंत्रण विभागातील मलईदार बदल्या चक्क ‘ई-मेल’द्वारे करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

मनोज कापडे

Pune News : कठोर नियम दाखवून बदल्यांमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या छळ करणाऱ्या कृषी विभागाने गुणनियंत्रण विभागातील मलईदार बदल्या चक्क ‘ई-मेल’द्वारे करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात घडलेल्या या प्रकरणात एकाच पदावर दोन गुणनियंत्रण निरीक्षकांची केलेली वादग्रस्त नियुक्ती न्यायालयाने नियमबाह्य ठरवली आहे.

पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षातील पदे राज्यातील मलईदार पदांमध्ये गणली जातात. या कक्षातील ‘कृषी अधिकारी (गुणनियंत्रण)’ पदावर येण्यासाठी मोठी रस्सीखेच चालू असते. या पदाला निविष्ठा उद्योगात ‘क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर’ असे म्हटले जाते.

‘इन्स्पेक्टर’ पदासाठी स्पर्धा चालू असतानाच सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण कक्षाचे निरीक्षक धनंजय दिनकर पाटील यांनी बाजी मारली. या पदावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी पाटील यांची नियुक्ती होताच त्यांना सोलापूरमधून कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर १४ ऑक्टोबरला ते पुण्यात निरीक्षक म्हणून रुजू झाले.

ई-मेल चक्क ‘डिलीट’ केला

नागरी सेवा मंडळाची शिफारस नसताना गुणनियंत्रण निरीक्षकपदी पाटील यांची नियुक्ती मंत्रालयातून झालेली असताना पुन्हा मंत्रालयाने त्याच दिवशी आणखी एक जबरदस्त खेळी केली. पाटील यांच्या पदावर पुन्हा सातारा येथील खंडाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी विलास बापूराव घायगुडे यांची देखील नियुक्त केले. विशेष म्हणजे पाटील व घायगुडे या दोघांची नियुक्ती मंत्रालयातून ‘ई-मेल’द्वारे केली गेली.

कृषी आयुक्तालयाने मात्र पुढे पाटील यांचा ई-मेल चक्क ‘डिलीट’ केला. परंतु घायगुडे यांचा ई-मेल ग्राह्य मानला आणि १५ ऑक्टोबरला घायगुडे यांना हजरदेखील करून घेतले. त्यामुळे पुण्यात एकाच पदावर दोन गुणनियंत्रण निरीक्षक तयार झाले. या प्रकरणामुळे कृषी विभागातील बदलांचे रॅकेट चव्हाट्यावर आले. मंत्रालयातून सुरू झालेल्या ‘एक पद आणि दोन गुणनियंत्रण निरीक्षक’ या पॅटर्नची जोरदार चर्चा राज्यातील निविष्ठा उद्योगात अजूनही चालू आहे.

नागरी सेवा मंडळाची शिफारस नाही

सूत्राच्या म्हणण्यानुसार, संतप्त झालेल्या पाटील यांनी घायगुडे यांच्या नियुक्तीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले. याचिकेत पाटील यांनी कृषी खात्याचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व घायगुडे यांना प्रतिवादी केले होते. या याचिकेच्या निकालाकडे राज्यातील गुणनियंत्रण निरीक्षकांचे लक्ष लागून होते. न्यायालयाने राज्य शासनाचे म्हणणे ऐकून घेतले व या आठवड्यात दिलेल्या निकालपत्रात घायगुडे यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवली.

‘ई-मेल’वर नियुक्ती आदेश देणारा कोण?

नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी असल्याशिवाय बदल्या न करण्याचे संकेत आहेत. मात्र मंत्रालयातून कृषी आयुक्तालयात परस्पर बदल्यांचे आदेश ‘ई-मेल’द्वारे घाईघाईने पाठवणारा अधिकारी कोण, या अधिकाऱ्याला असे करण्यास कोण भाग पाडत होते, या काळात कृषिमंत्रिपदी असलेले धनंजय मुंडे व कृषी आयुक्तपदी असलेले सनदी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विरोध का केला नाही, असे सवाल आता कृषी आयुक्तालयात उपस्थित केले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT