Union Budget 2024 News : केंद्र सरकारने शेतमालाची मूल्यसाखळी उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचं पीक काढणीनंतर होणारे नुकसान कमी झाले. जास्तीचं उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीसाठी संसाधन आणि कृषी तंत्रज्ञानाची जोड दिली.
तसेच बाजारपेठ, शेतमालाची खरेदी आणि प्रक्रिया उद्योगाची जोड दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्तपन्न आणि उत्पादकता वाढली, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (ता.१) सादर करताना सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या, "२०२२ वर्ष आत्मनिर्भर तेलबिया अभियान सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि भूईमूग आदि पिकांचा समावेश होता. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. तसेच नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे हवामान बदलात त्याचा वापर परिणामकारक ठरत आहे." असं अर्थमंत्री म्हणाल्या.
प्रधानमंत्री किसान संपदा योजनेतून ३८ लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा अर्थमंत्री सीतारामन यांनी दावा केला. तसेच दूध उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, देशात खाद्यतेल आयातीमुळे शेतकऱ्यांच्या तेलबिया पिकांना दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत नसल्याचे शेतकरी सांगतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी गुरुवारी (ता.१) संसदेत २०२४-२५ चा अर्थसंकल्प मांडला. देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.