Population Census  Agrowon
ॲग्रो विशेष

Population Census : देशातील जनगणना सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार ?

जनगणनेची जबबादारी गृह आणि सांख्यिकी मंत्रालयावर असते. या दोन मंत्रालयाकडून समाजिक आणि आर्थिक माहितीसह इतर माहिती एकत्र गोळा केली जाते.

Dhananjay Sanap

देशात सप्टेंबर महिन्यात जनगणना होऊ शकते. २०११ पासून देशात जनगणना झालेली नाही. दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु २०२१ मध्ये कोविडमुळे जनगणना केली नाही. आता मात्र सप्टेंबर महिन्यापासून जनगणना सुरू केली जाईल, अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

२०२६ पर्यंत जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. १८ महीने जनगणनेचं काम चालेल. मात्र जनगणनेला केला जाणाऱ्या विलंबावर अर्थशास्त्रज्ञ टिका करत आहेत. जनगणनामध्ये आर्थिक माहिती, महागाई, रोजगार अंदाज यासारख्या मुद्द्यांचा समावेश असतो. त्यामुळं जनगणनेतील विलंबामुळे या मुद्द्यांची अचूक माहिती मिळत नाही, अशी टिका अर्थशास्त्रज्ञ करत असल्याचं रॉयटर्सने वृत्तात सांगितलं आहे.

जनगणनेची जबबादारी गृह आणि सांख्यिकी मंत्रालयावर असते. या दोन मंत्रालयाकडून समाजिक आणि आर्थिक माहितीसह इतर माहिती एकत्र गोळा केली जाते. त्यावर आधारित योजना आखल्या जातात. त्यानुसार नागरिकांना लाभ दिला जातो. मार्च २०२६ पर्यंत जनगणनेची माहिती एकत्र केली जाईल. यामध्ये १५ वर्षाची माहिती एकत्र करण्यात येणार आहे, असंही रॉयटर्सने वृत्तात म्हंटलं आहे.

दरम्यान, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात भारत जगात पाहिल्या क्रमांकावर पोहचल्याचं गेल्यावर्षी अमेरिकेच्या अहवालात सांगण्यात आलं होतं. म्हणजेच भारताने लोकसंख्येच्याबाबत चीनला मागे टाकलं आहे. परंतु भारताने २०११ नंतर जनगणना केलेली नाही. त्यामुळे सप्टेंबरपासून जनगणना सुरू होईल. आणि मार्च २०२६ पर्यंत अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असं रॉयटर्सच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT