Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : गिरणा पट्ट्यात वाढणार केळी लागवड

Banana Production : कृषी विभागाचा अंदाज; ‘गिरणा’सह ‘मन्याड’ शंभर टक्के भरल्याने समाधान

Team Agrowon

Banana Farming : मेहुणबारे, ता. चाळीसगाव ः उसापाठोपाठ यंदा गिरणा परिसरात केळीची लागवड वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी गिरणा धरणासह मन्याड धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उसासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहे.

केळी लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी चार महिन्यापूर्वीच केले होते. कृषी विभागाच्या नोंदीनुसार सध्या ५४१ हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड झाली आहे. मार्चअखेर साधारणतः एक हजार हेक्टरवर केळी लागवड होईल असे चित्र दिसून येत आहे. चाळीसगाव तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या गिरणा व मन्याड धरण शंभर टक्के भरले असून लहानमोठ्‍या प्रकल्पांमध्ये पाणी आले आहे. केळीला लागणारे पाणी सध्या उपलब्ध असल्याने सद्यःस्थितीत सुमारे ५४१ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे साधारणतः एक हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. केळी रोपांचे नियोजन गिरणा परिसरातील शेतकऱ्याची केळी देशांतर्गत नव्हे तर इराक, इराण यासारख्या आखाती देशातही निर्यात होऊ लागली आहे. केळीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढला आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी ‘टिश्यू कल्चर’ या महागड्या केळी रोपाचा वापर न करता प्रथमच कंदपासून (खोड) रोपे तयार करून केळीचे उत्पादन घेतल्याचे दिसून येत आहे.

त्यात अनेकांना भरघोस फायदा झाला. यामुळे इतर खर्चाला फाटा देत कंदापासून रोप तयार करण्याकडे देखील शेतकरी वळत आहेत. ‘टिश्यू क्लचर’च्या रोपांसाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. जे शेतकरी अशी नोंदणी करतात, त्यांनाच केळीचे रोप मिळते. इतरांना मात्र इतर जातीच्या केळीच्या रोपांची लागवड करावी लागत असल्याने तालुक्यात इतर जातीची केळी लागवड होताना दिसत आहे.

नुकसान होऊनही केळीलागवड मेहुणबारेसह वरखेडे, पळासरे, खडकीसीम, लोंढे, दरेगाव आदी भागात काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीचे कापणीवर आलेले घड जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वरखेडे भागातील प्रकाश गवारे या शेतकऱ्याचे तर तब्बल ९०० केळीची झाडे वादळामुळे उन्मळून पडली. पळासरे शिवारातही अनेक शेतात केळीचे असे नुकसान झाले. या नैसर्गिक नुकसानीनंतर केळीला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने या भागातील शेतकरी पुन्हा केळी लागवडीकडे वळले आहेत.

रानडुकरांपासून धोका

वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पामुळे बॅरेज परिसरातील वन्यप्राण्यांसाठी देखील पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे या भागात रानडुकरांचा वावर वाढला आहे. मात्र, रानडुकरांचे कळपच्या कळप नवीन लागवड केलेल्या केळीचे पीक उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेक शेतकरी रात्री शेतात फटाके वाजवतात तर काही शेतकरी शेतात बॅटऱ्या बांधतात. विविध उपाययोजना करुनही रानडुकरांचा उपद्रव कमी होत नसल्याने वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT