Sindhudurg News : जिल्ह्यात आंबा, काजूपेक्षा बांबू लागवडीकडील कल वाढू लागला आहे. त्यामुळे बांबू रोपांच्या किमतीत देखील सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. सध्या बांबूची रोपे १५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. बदलत्या वातावरणाचा फटका जिल्ह्यातील आंबा, काजूसह इतर फळपिकांना बसत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांबू लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत बांधावर केली जाणारी बांबू लागवड पूर्ण क्षेत्रावर होऊ लागली आहे. गेल्या तीन वर्षांत ३ हजार २०१ हेक्टरवर बांबू लागवड झाली आहे. या वर्षी ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांबू लागवड होण्याचा अंदाज आहे. बांबू लागवडीकडील शेतकऱ्यांचा कल वाढत असल्यामुळे बांबू रोपांच्या किमतीत देखील सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात १०० ते १५० रुपये प्रतिरोपांचा दर होता. त्यात सुधारणा होऊन हा दर आता १५० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. बांबू लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांबू लागवड करताना दिसत आहेत.
बांबूच्या बेटाना कोंब येण्यापूर्वी अधिकतर शेतकरी बांबू लागवड करतात. ज्यादातर शेतकरी बांबू बेटातील रोपांवर भर देतात. तर काही शेतकरी रोपवाटीकेतील रोपांची देखील लागवड करीत आहेत.
माझी आंबा, काजूची झाडे आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून मी बांबू लागवडीवर भर दिला आहे. दर वर्षी ५० ते १०० बांबूची लागवड मी करतो. पूर्ण वाढ झालेल्या बेटांमधील रोपांची विक्री देखील करतो.- संकेत पवार, बांबू उत्पादक, खांबाळे, ता.वैभववाडी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.