Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकरी विमा परताव्याच्या प्रतीक्षेत

Crop Insurance Scheme : पुनर्रचित हवामान आधारित संत्रा फळपीक विमा नोव्हेंबर २०२३ /२४ मध्ये एका इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढला होता.

Team Agrowon

Amaravati News : पुनर्रचित हवामान आधारित संत्रा फळपीक विमा नोव्हेंबर २०२३ /२४ मध्ये एका इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढला होता. शासनामार्फत गारपीट नुकसानीचे पंचनामेसुद्धा करण्यात आले होते.

परंतु विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप पडली नाही. त्यामुळे विमा परतावा तातडीने मिळावा, यासाठी संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

यावर्षीची झालेली अतोनात संत्रा फळगळ, बुरशीजन्य रोग, गगनाला भिडलेले कृषी निविष्ठांचे भाव अशा विविध प्रकारच्या रोगांनी संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. आंबिया बहरात एप्रिलच्या कालावधीत झालेली गारपीट, त्यामुळे संत्र्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा परताव्यासाठी कंपनीकडे सूचना दाखल केल्या.

झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांचे दावे कंपनीकडून मंजूर करण्यात आले. याकरिता शेतकऱ्यांनी गारपीट आंबिया बहरासाठी वाढीव दराने प्रीमियम भरला आहे. मात्र राज्य सरकारने त्यांचा हिस्सा भरला नसल्याने दावे मंजूर केल्यानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा मिळू शकला नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून संत्रा उत्पादक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा विमा परतावा मिळाल्यावर शेतकरी आंबिया बहराचा नोव्हेंबरमध्ये विमा काढू शकेल. त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादकांना विमा परतावा द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

राज्य सरकारने तातडीने हप्ता भरावा

राज्य सरकारने विमा हफ्ता न भरल्याने चांदूरबाजार तालुक्यातील आंबिया बहराच्या गारपीट नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना विमा परतावा मिळाला नाही. दुसरीकडे जोपर्यंत राज्य सरकार विमा हप्ता भरणार नाही, तोपर्यंत परतावे मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक कोंडीत सापडले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना टोल फ्री क्रमांक नावापुरताच

योजनेच्या १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविल्या जातात. शासन कंपनीचे प्रीमियम भरण्यात का दिरंगाई करीत आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे टोल फ्री क्रमांकावरील कर्मचाऱ्यांकडे नाहीत. परंतु त्या तक्रारींचे कुठलेही समाधान केल्या जात नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT