Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : विहिरी, कूपनलिका आटल्याने कांदा पिकात सोडली जनावरे

Team Agrowon

Nashik News : सटाणा तालुक्यातील पिंपळदर गाव परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शिवारातील पाण्याचे स्रोत विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटू लागल्याने शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेली पिके सोडल्याचे चित्र आहे.

गाव शिवारातील अनेक विहिरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या झालेल्या कांदा व इतर पिकात जनावरे सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. चालू वर्षी तीळवन, निरपूर, खमताने, पिंपळदर या भागांत डोंगररांगांना लागून क्षेत्रात पर्जन्यमान कमी राहिल्याने या भागातील छोटे मोठे तलाव, नाला बांध पावसाळ्यात देखील कोरडे राहिले.

त्यामुळे या भागातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होती. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी पुरेल या आशेवर कांद्याची लागवड केली होती.

मात्र सध्या पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने अनेक शेतकऱ्यांनी दोन ते अडीच महिन्यांची कांदा पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. पिंपळदर येथील शेतकरी अंबर रामा पवार यांनी आपला दोन ते अडीच एकर कांदा पिकात मेंढ्या सोडून दिल्या आहेत. शासनाने दुष्काळ जाही करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT