Ajit pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी अमित शहा यांची भेट घेणार : अजित पवार

Swapnil Shinde

Raigad News : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कर्जत येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राकडे मागणी करण्यार असल्याची माहिती दिली. या शिबिराला राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

अजित पवार म्हणाले, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात मदत व पुनवर्सन मंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यासह इतर मंत्र्यांनी पाहणी केली आहे. तसेच प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा झाली आहे. आगामी नागपूर अधिवेशनामध्ये त्याबाबत घोषणा करण्यात येईल.

राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, सध्या अवकाळी पावसामुळे पीक जमीनदोस्त झाली आहे. संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतची मागणी करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT