Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Waiver for Farmers : योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

Farmer Karjmafi : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं सरकार कधीही म्हणालं नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. आपल्याकडे कुणालाही कायदा हातात घेता येत नाही. संविधानाने हे राज्य आणि देश चालतो. असं तुडवा. मारा, ठोका, असं चालत नाही, असं अजित पवार म्हणाले.

Dhananjay Sanap

Ajit Pawar Kar: योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांनी गुरुवारी (ता.१२) अकोला येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी दूध प्रश्न, बच्चू कडू यांचं उपोषण आणि शेतकरी कर्जमाफीवर अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मागील पाच दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे. कडू यांच्या उपोषणाला आमदार-खासदार, विविध संस्थांकडून पाठिंबा दिला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीही कडू यांच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा दिला आहे. शेट्टी यांनी पाठिंबा देताना राज्य सरकारची मंत्री दिसतील तिथे तुडवा, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

त्यावर अजित पवार यांनी ही ठोकशाही वा हुकूमशाही नसून लोकशाही असल्याची आठवण शेट्टी यांना करून दिली. "शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं सरकार कधीही म्हणालं नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. आपल्याकडे कुणालाही कायदा हातात घेता येत नाही. संविधानाने हे राज्य आणि देश चालतो. असं तुडवा. मारा, ठोका, असं चालत नाही." असंही पवार म्हणाले.

बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून मार्ग निघू शकतो, असं म्हणत अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. अलीकडेच शेतकरी कर्जमाफीबद्दल मी घोषणा केली होती का, अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावरून शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची चर्चा रंगली होती. तसेच शेतकऱ्यांकडून संतापही व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा लागली आहे. परंतु राज्य सरकार मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाल करताना दिसत नाही.

त्यामुळे बच्चू कडू यांनी मागील दोन महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी, शेतमालाचे भाव, दूध दर, कांदा प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ८ जूनपासून अमरावती जिल्ह्याती मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण पुकारलं आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी मरण पत्करू परंतु झुकणार नाही, अशी भूमिकाही बच्चू कडू यांनी घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani : ‘ई-पीकपाहणी’चा खोळंबा

Crop Damage Survey : बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा

Latur Rain : दुसऱ्या दिवशीही लातुरात पावसाच्या जोरदार सरी

Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीतील ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीस गती

SCROLL FOR NEXT