Ajit Nawale Agrowon
ॲग्रो विशेष

Long March : समितीतून अजित नवलेंना वगळले; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

किसान सभेच्या आंदोलकांमध्ये असलेली अंतर्गत धुसफूसही यानिमित्ताने समोर आली. किसान सभेच्या मागण्या तत्काळ मान्य न करता समितीचा बोळा फडणवीसांनी फिरवला आहे.

Team Agrowon

Long March Update : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्याच्या बाबत स्थापन केलेल्या समितीत फक्त आमदार आणि माजी आमदार असतील, याबाबतचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात अला होता, त्याप्रमाणे समितीतील सदस्याची नावे ठरली आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शनिवारी सांगितले.

लॉंगमार्चमधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनविली जावी, अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत शुक्रवारी (ता.१७) झालेल्या बैठकीत केली होती.

सरकारने स्थापन केलेल्या समितीतून नवले यांना वगळण्यात आले. त्यामुळे किसान सभेने याबद्दल मुख्य सचिवांना कारण विचारले, परंतु कोणतेही कारण न देता नाव डॉ. नवले यांचे नाव वगळण्यात आले.

डॉ. अजित नवले यांचे नावे समितीतून वगळण्यात आले. त्यांचे नाव का वगळण्यात आले याबद्दल फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी फडणवीस बोलत होते.

नवले यांचे नाव वगळल्यामुळे फडणवीसांच्या भूमिकेवर किसान सभेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच फडणवीसांनी जुना राग काढल्याच्या चर्चेलाही पेव फुटले आहेत.

तसेच किसान सभेच्या आंदोलकांमध्ये असलेली अंतर्गत धुसफूसही यानिमित्ताने समोर आली. किसान सभेच्या मागण्या तत्काळ मान्य न करता समितीचा बोळा फडणवीसांनी फिरवला आहे.

सरकारने समितीच्या आडून पळवाट शोधली असून तरीही किसान सभेने आंदोलन मागे घेण्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

फडणवीसांना नवले समितीत का नको आहेत? समितीचा अहवाल स्वीकारला जाईल का? की, मागील मोर्च्यासारखी याही वेळी आंदोलक शेतकऱ्यांची फसवणूक राज्य सरकार करेल? अशा शंकाही शेतकरी व्यक्त करत आहेत.

वन जमिनीच्या प्रश्ना बरोबरच, कांदा, दूध, सोयाबीन, कापूस, हरभरा, हिरडा पिकांचे घसरत असलेले भाव, मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली लूट, कर्जमाफी, देवस्थान व गायरान जमीन, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, पुनर्वसन, यासारख्या प्रश्नांवर बाजू मांडण्यासाठी डॉ. अजित नवले समितीत हवेत अशी किसान सभेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

मागील लॉंगमार्चच्या वेळीही चर्चेसाठीच्या शिष्टमंडळात डॉ. अजित नवले यांना आणू नका असा आग्रह तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला असल्याची चर्चा रंगली होती. त्यावरून वाद झाल्यानंतर डॉ. नवले यांचा शिष्टमंडळात समावेश करण्यात आला.

१ जून २०१७ च्या शेतकरी संपाच्या वेळी शेतकरी संपात फूट पाडण्याची खेळी उधळून लावल्यामुळे व शेतकरी प्रश्न सुटेपर्यंत डॉ. नवले मुद्दा सोडत नाहीत, यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांना समितीत डॉ. अजित नवले नको असावेत अशी चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT