Hurricane Agrowon
ॲग्रो विशेष

Hurricane : आग्नेय आशियानंतर भारतावर ‘यागी’चे ढग

Team Agrowon

New Delhi : तब्बल ३८०० किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम भारताच्या हवामानावर होत आहे. अर्थात, यागीचा परिणाम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशसाठी फायदेशीर ठरला आहे. या भागातील पावसाची उणीव या वादळामुळे भरून निघाली आहे. यागी चक्रीवादळ पश्‍चिमेकडे म्हणजेच भारताकडे वळत आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राने यागी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या व्हिएतनामला सुमारे दोन दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. व्हिएतनामध्ये सुमारे २९० जण मृत्युमुखी पडले. याशिवाय अडीच लाख घरांची हानी झाली असून, तीस लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे.

प्रशांत महासागरात निर्माण झालेले वादळ सुरुवातीला चीनच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आणि त्याचा बदल विनाशकारी चक्रीवादळात झाला. त्याचा वेग ३५० किलोमीटर प्रतितास होता. या चक्रीवादळाने फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, लाओसला धडक दिली. काही दिवसांपूर्वी यागी वादळाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, आता ३८०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून भारतात प्रवेश करत आहे.

या चक्रीवादळाचा परिणाम दिल्ली-एनसीआर, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडत आहे. मात्र यागी चक्रीवादळाचा परिणाम लवकरच संपेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पण परतीचा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. यागी चक्रीवादळामुळे भारतातील हवामान बदलण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पश्‍चिम आणि पूर्व राजस्थानात पाऊस पडू शकतो. २७ सप्टेंबरनंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Labor Problem : शेतमजूर शेती क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात

Soybean Rate : आता सोयाबीनच्या दरवाढीसाठी सत्ताधाऱ्यांना गाव बंदी करा, तुपकरांचे थेट शेतकऱ्यांनाच आवाहन

Interview with Dr Hemant Wasekar : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विश्‍वासार्हता जपावी

Crop Damage : मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधारा; काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान

Village Story : रस्त्याचे ऋण...

SCROLL FOR NEXT