Electricity
Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity News : खंडित विजेला फोर्स लोडशेडिंगचे जोड

Team Agrowon

हेमंत पवार

Karad Electricity News : शेतीसाठी देण्यात आलेली आठ तास वीजही अखंडपणे मिळत नाही. त्यातच उन्हाळा असल्याने विजेची मागणी वाढल्याने सध्या शेती पंपासाठी अधून-धून फोर्स लोड शेडिंगही करण्यात येत आहे. सलग आठ तास वीज मिळणे आवश्यक असतानाही पुन्हा फोर्स लोड शडिंगचा भार शेतीपंपावर टाकला आहे.

त्यामुळे पंपाला देण्यात आलेल्या विजेची वेळ महावितरणकडून पाळली जात नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी असूनही पिकांना ते देता येत नसल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर असल्याची कैफियत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

पूर्वी शेतीसाठी रात्रीचीच वीज दिली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत होते. उद्योगांना दिवसा वीज आणि जगाच्या पोशिंद्याला रात्रीची वीज दिली जात असल्याने त्याविरोधात शेतकरी संघटना, शेतकरी यांच्यातून मोठा उठाव झाला.

त्यासाठी अनेकदा मोर्चा काढण्यात आले. आंदोलने करण्यात आली. त्यानंतर सरकारने त्याची दखल घेतली आणि शेतीपंपाना दिवसा आणि रात्रीही वीजपुरवठा करण्याची तरतूद केली. मात्र उद्योगाला जशी अखंडपणे वीज दिली जाते, तशी शेतीपंपाना दिली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

पूर्वी शेती पंपाला दिवसा आठ तास आणि रात्री दहा तास वीज पुरवठा केला जात होता. मात्र ऑक्टोबरमध्ये वीज निर्मितीस लागणारा कोळसा भिजल्याने दहा तासाची वीज पुन्हा आठ तास करण्यात आली. कोळसा उपलब्ध झाल्यानंतर परत रात्री दहा तास वीज दिली जाईल, असे त्यावेळी जाहीर केले.

मात्र त्याची अंमलबजावणीच झाली नाही. शेतीपंपासाठी जेवढा कालावधी महावितरणने वीज देण्यासाठी मान्य केला आहे तेवढ्या कालावधीत अखंडपणे वीज देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक गावच्या शिवारातील शेतीपंपांना सलग आठ तास वीज मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

अनेकदा वीज खंडित होते. महावितरणकडून जेवढ्या कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित झाला होता तेवढी वेळ पुढे वाढवून देण्याचीही मागणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

वेळेत मेंटेनन्स नसल्याचाही फटका

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या विजेच्या तारा शिवारात लोंबकळत आहेत, अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वादळी पावसाचे वारे सुटले की शेती पिकांचे घर्षण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. वेळेत मेंटनन्स न केल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याकडेही महावितरणे दुर्लक्षच केले आहे.

शेतीपंपाला जी आठ तास वीज दिली जात आहे तीही अनेकदा खंडित होते. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यातच सध्या फोर्स लोड शेडिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके वाळत आहेत. त्याविरोधात शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे.
सुनील कणसे शेतकरी, शेणोली
विजेची मागणी वाढून अचानक लोड वाढल्यावर महावितणच्या राज्याच्या लोड डिस्पॅच सेंटरमधून फोर्स लोड शडिंगच्या सूचना दिल्या जातात. त्यानुसार ते विभागनिहाय लोड शडिंग करावेच लागते. विजेचा लोड कमी करून पूर्ववत येण्यासाठी काहीकाळ ते करण्याशिवाय पर्यायच नसतो. शेतीपंपाला दिलेल्या वेळेत अखंडित वीज मिळावी यासाठी आमचे प्राधान्य आहे.
रवींद्र बुंदेले, कार्यकारी अभियंता, महावितरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT