Girana Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Girana Dam : गिरणा धरणातून तिसरे आवर्तन सुटले

Water Circulation : गिरणा पट्ट्यासाठी ऐन उष्णतेच्या लाटेत एक आनंदाची बातमी आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ७) गिरणा धरणातून नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गिरणा पट्ट्यासाठी ऐन उष्णतेच्या लाटेत एक आनंदाची बातमी आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ७) गिरणा धरणातून नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गिरणापट्टा पाण्यासाठी कासावीस झाला आहे. त्यामुळे सर्वाचे लक्ष गिरणा धरणातून केव्हा आवर्तन सोडण्यात येते याकडे लागले होते. निम्मा जळगाव जिल्ह्याची पाण्याची तहान गिरणा धरणावर अवलंबून आहे.

यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने धरणातून फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. उद्या धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा पट्ट्यात सध्या तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी गिरणा धरणातून २००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.

कानळदापर्यंत पाणी

गिरणा धरणातून २००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ते जळगाव तालुक्यातील कानळदापर्यंत जाणार आहे. त्यामुळे गिरणा काठावरील गावांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. सद्य:स्थितीला काठावरील गावांना मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाचोरा व अन्य शहरांसह नदीकाठची गावे तहानली आहे.अत्यल्प पावसामुळे गिरणा नदी एकदाही वाहून निघाली नाही. त्यामुळे पाणी पातळीत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. पर्यायाने काठावरील पाणीपुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे गणित पुरते कोलमडून गेले आहे.

चौथे आवर्तन मे महिन्यात

यंदा गिरणा धरणातून बिगर सिंचनासाठी चार आवर्तन सोडण्यात आलेला आहेत. आतापर्यंत दोन आवर्तन सोडण्यात आलेले आहेत. तर उद्या तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चौथे आवर्तन सोडता येणार आहे. सद्यःस्थितीत धरणात ३०.९७ टक्के पाणीसाठा आहे.

एका आवर्तनाला १०-१२ टक्के पाणीसाठा लागतो. त्यामुळे हे आवर्तन सोडल्यानंतर १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. मे महिन्यात चौथे आवर्तन सुटल्यानंतर ही ७-८ टक्के पाणीसाठा धरणात राहील. त्यामुळे पावसाळा लांबल्यास जून मधे ही पाचवे आवर्तन सुटू शकते. गिरणा धरणावरील योजनेवर चाळीसगाव नगरपरिषद, जळगाव महापालिका, नांदगाव व ५६ खेडे व दहिवाळ व २५ गावांची योजना आहे. याशिवाय भडगाव, पाचोरा १७५ योजना अवलंबून आहेत. आवर्तनाला १४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

धरणात ३१ टक्के पाणीसाठा

''गिरणा''धरणात सद्य:स्थितीला ५ हजार ७३० दशलक्ष घनफूट एवढा म्हणजेच ३०.९७ एवढा पाणीसाठा आहे. तर हा जिवंत पाणीसाठा सोडून ३००० हजार दशलक्ष घनफूट एवढा मृत साठा आहे. या आवर्तनासाठी १ हजार ४०० दशलक्ष घनफूट तेवढे पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यात हुडहुडी कायम राहणार; राज्यातील बहुतांशी भागात तापमानात मोठी घट

Pulse Cultivation: रायगडमध्ये कडधान्य लागवड अडचणीत

Soybean Procurement: सोयाबीन, उडीद विक्रीसाठी सांगलीत २०० शेतकऱ्यांची नोंदणी

Maharashtra Politics: 'उदय सामंत कोणत्याही क्षणी जवळचा गट घेऊन भाजपसोबत जातील'; अंधारेंच्या दाव्यानं खळबळ, नेमकं खरं काय?

Crop Management: कारल्यामध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT