Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cursing : गळीत हंगामाची सुरुवात संथच ; ७.२५ लाख टनांनी साखर उत्पादनही घटले

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशात यंदा साखर हंगामाची सुरुवात संथ झाली आहे. यंदा ऑक्टोबरमध्‍ये गळीत हंगामाची सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरअखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. गत वर्षी या तारखेपर्यंत ३१७ कारखाने सुरू झाले होते. ऊसगाळप १६२ लाख टन झाले आहे. ते गतवर्षीच्या तुलनेत ८४ लाख टनांनी कमी आहे. या कालावधीत १२.७५ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २० लाख टन लाख साखर तयार झाली होती. गेल्‍या वर्षीच्या तुलनेत ७.२५ लाख टनांनी साखर उत्पादनही घटले आहे.

यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. त्यातच पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊसदर आंदोलनामुळे हंगाम उद्‍घाटनाची विधिवत सुरुवात होऊनदेखील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. याचा फटका ऊसगाळपावर झाला आहे.

गेल्या वर्षी साखर हंगामात साखरेचे निव्वळ उत्पादन ३३९ लाख टन झाले होते. त्या व्यतिरिक्त ४३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झाला होता. मात्र यंदा ४० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविल्यानंतर साखरेचे उत्पादन २९१ लाख टन इतकेच होण्याचा केंद्र शासनाचा अंदाज आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे वातावरण बदल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे ऊसगाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे.

यंदा महाराष्‍ट्रातील प्रमुख क्षेत्र असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस तोडणी अतिशय नाममात्र सुरू आहे. अनेक कारखाने क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात ऊसगाळप करत असल्याने याचा एकंदरीत परिणाम ऊसगाळपावर झाला आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर संघ

नेपाळ, भूतानला साखर निर्यात शक्‍य

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नव्या राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्थेमार्फत नेपाळ आणि भूतानला ५० हजार टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय झाला आहे. ही निर्यात पूर्णपणे सहकारी साखर कारखान्यांच्या साखरेची होणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राची स्थिती बिकट

राज्यात हंगामास प्रारंभ होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. राज्यातील केवळ १०३ कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १४१ कारखाने सुरू झाले होते. यंदा केवळ २ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी ती ८ लाख टन तयार झाली होती. यावरूनच राज्यातील यंदाच्या हंगामाची गती स्पष्ट होते.

प्रमुख राज्यातील ऊसगाळप (१५ नोव्‍हेंबरअखेर)

राज्य...सुरू कारखाने (२३-२४)...सुरू कारखाने (२२-२३)...गाळप (२३-२४)...गाळप (२२-२३) (लाख टन)...साखर उत्पादन (२३-२४)...साखर उत्पादन (लाख टन) (२२-२३)

उत्तर प्रदेश...७५...७६...३९...४६...३.४०...३.६०

महाराष्‍ट्र...१०३...१४१...३६...१०१...२.४०...८.६०

कर्नाटक...५०...६२...५३...७६...४.३०...६.१०

गुजरात...१३...१४...११...७...०.८०...०.६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT