Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop in Crisis : कापूस उत्पादकांना ५०० कोटींचा फटका

Cotton Market : मागील वर्षाच्या तुलनेत भावातही मंदी असल्याने नाशिक जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ५०० ते ५५० कोटींची झळ सहन करण्याची वेळ आली आहे.

Team Agrowon

Yeola News : बाजारभावातील चढ-उतार अन् रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे एकतर जिल्ह्यातील पांढऱ्या सोन्याचे अर्थात कपाशीचे लागवड क्षेत्र घटत आहे. त्यातच यावर्षी पावसाअभावी झाडांची खुंटलेली वाढ,

रोगाचे आक्रमण आणि झाडाला बोंडेच न लागल्याने यंदा कपाशीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाली आहे. त्यातच मागील वर्षाच्या तुलनेत भावातही मंदी असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ५०० ते ५५० कोटींची झळ सहन करण्याची वेळ आली आहे.

१९९५ पासून जिल्ह्यातील खानदेशसह मराठवाड्याच्या लगत असलेल्या तालुक्यामध्ये कपाशीचे पीक घेतले जाते. सुरुवातीला कपाशीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली भर घातली असून याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या अर्थकारणालाही आधार दिला आहे.

मात्र उत्पादन खर्च वाढ, रोग व भाव अस्थिर झाल्याने हळूहळू कपाशीचे क्षेत्र काहीसे कमी झाल्याचे दिसते. यावर्षी तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांनी मका व कांद्याचे क्षेत्र वाढविले आहे. वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातील घट आणि भावातही अपेक्षित वाढ होत नसल्याने क्षेत्र घटले आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही मोठ्या प्रमाणात कपाशीचे क्षेत्र घटल्याने कापसाचे उत्पादन घटले असून मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने यावर्षी दरामध्ये अचानक विक्रमी वाढ झाली आहे.

मागील वर्षी सरासरी आठ ते नऊ हजार रुपये दराने कापूस विकला गेला तर दोन वर्षांपूर्वी १२ हजारपर्यंत दर पोहोचले होते. असे असले तरी कपाशी न परवडणारे पीक होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्रात घट केली आहे.

यावर्षी पावसाने सुरुवातीलाच उशिराने हजेरी लावल्याने थेट जुलैला कापसाची लागवड झाली. त्यातही सुरुवातीला रिमझिमवर कापूस पीक तगले पण ऐन वाढीचे आणि बोंडे लागण्याच्या स्थितीतच पावसाचा मोठा खंड गेल्याने कपाशीचे पूर्ण वाट लागली.

एरवी चार ते सहा फूट उंचीपर्यंत झाड वाढून सरासरी ७०-८० बोंडे यायचे तेथे यंदा दोन ते तीन फुटांतच झाड अडकून अवघी १० ते २० बोंडे आली. जिल्ह्यात ४५ हजार एकरपर्यंत कपाशीचे क्षेत्र वाढले होते.

मात्र यंदा जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली. जाणकारांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात कापसाचे जिरायती क्षेत्रात ५ ते ८ क्विंटल तर बागायती क्षेत्रात १२ क्विंटलच्या दरम्यान तर सरासरी १० क्विंटल उत्पादन निघते.

एकराला सरासरी खर्च ३० ते ४० हजारापर्यंत येतो. जिल्हात एकरी ८ ते १२ क्विंटल सरासरी कापूस निघतो, तेथेच या वर्षी प्रतिएकरात फक्त १ ते ५ तर सरासरी ४ क्विंटल कापूस निघाला. गंभीर म्हणजे माळरानावरील कोरडवाहू शेतातील कापसाचे झाड वाढले नाही अन त्याला कापूसही लागला नव्हता.

परिणामी शेतकऱ्यांचा लागवड खर्चही पाण्यात गेला आहे. कपाशीला रब्बीत पाणी देऊन शेतकरी दुबार उत्पादन म्हणजे फरदड घ्यायचे पण यंदा मुख्य हंगामातच कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली.

जिल्ह्यात ९९ हजार ७४५ एकरवर कापूस लागवड झाली होती. या क्षेत्रात सरासरी एकरी १० क्विंटल कापूस निघून सरासरी ७ हजार रुपये भावाने ७०० कोटींचे उत्पादन अपेक्षित होते. मागील वर्षीप्रमाणे दर मिळाला असता तर हेच उत्पन्न ९०० ते ९५० कोटी मिळाले असते.

मात्र, अल्प पावसामुळे मोठे नुकसान होऊन यावर्षी केवळ सरासरी साडेतीन ते ४ क्विंटलच कापूस निघाला आहे. सरासरी ७ हजारांच्या दरानुसार सुमारे २५० ते २८० कोटींच्या आसपास उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात पडले आहे.

या हिशेबानुसार दरातली घट व उत्पादन विक्रमी घटल्याने शेतकऱ्यांना ४५० ते ५५० कोटींहून अधिक झळ बसली आहे हे नक्की! काही शेतकऱ्यांना तर गुंतवलेले भांडवलही मिळालेले नाही.

जिल्ह्यातील सरासरी क्षेत्र

तालुका सरासरी

मालेगाव १७७५१

सटाणा ७८

नांदगाव ९१६४

निफाड ५७

सिन्नर १२६५

येवला १२००६

एकूण ४०३२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT