Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Bhogawati Sugar Scam : राज्यात ५ हजार कोटींचा साखर घोटाळा; राजू शेट्टींनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'

सहा महिन्यांपूर्वी कोल्हापुर जिल्ह्यातील भोगावती कारखान्याचं स्टिंग ऑपरेशन शेट्टी यांनी केलं होतं. त्याचं व्हिडिओ फुटेज आता समोर आलं आहे.

Dhananjay Sanap

Sugarcane FRP: राज्यातील साखर कारखान्यातून ५ हजार कोटींचा घोटाळा होत असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. राज्यातील साखर कारखानदार साखरेची रिकव्हरी कमी दाखवतात आणि जीएसटी न भरता अतिरिक्त साखर देशातील आणि पाकिस्तानच्या बाजारपेठेत विकतात, त्यांची कसलीही नोंद ठेवली जात नाही, अशी धक्कादायक आरोप शेट्टी यांनी केला आहे. गुरूवारी ते मुलाखतीत बोलत होते. त्यामुळे राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांची लूट अशी करतात याची चर्चा जोर धरू लागली आहे. तसेच इतकं सगळं घडूनही राज्य सरकार काहीच भूमिका का घेत नाही, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी कोल्हापुर जिल्ह्यातील भोगावती कारखान्याचं स्टिंग ऑपरेशन शेट्टी यांनी केलं होतं. त्याचं व्हिडिओ फुटेज आता समोर आलं आहे. भोगावती कारखान्यातून बाहेर पडलेल्या साखरेच्या ट्रकची कसलीही नोंद गेटवर केली जात नव्हती. त्या ट्रकमध्ये १० टन साखर होती. ती शेट्टी यांनी स्टिंग ऑपरेशन करून पकडली होती. रिकव्हरी कमी दाखवून किंवा काटा मारून साखरेचं जे उत्पादन होतं ते अशा प्रकारे कुठलीही नोंद न ठेवता विकलं जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

शेट्टी म्हणाले, "मी स्वत: या घोटाळ्या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करून कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण जिल्हा पोलिस प्रमुखानं आमची तक्रार घेतली नाही. त्यावेळी मी तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना फोन करून तक्रार केली. ते म्हणाले साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली की नाही हे तपासायचं काम आमचं आहे. पण साखर कारखाना चोरून साखर विकतो की, नाही हे बघायचं आमचं काम नाही. आम्ही चोर पकडला होता. चोर आम्हाला माहीत होता. पण तरीही आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यामुळे पकडलेला ट्रक सोडून द्यावा लागला." असा दावा शेट्टी यांनी केला आहे.

शेट्टी यांच्या गंभीर आरोपामुळे साखर कारखान्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान शेट्टी यांच्या आरोपाबद्दल खासदार शरद पवार यांनी गंभीर मुद्दा असल्याचं मत व्यक्त केलं. पवार म्हणाले, "राजू शेट्टी यांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या जर सत्य असतील तर गंभीर आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. अशा चुकीच्या गोष्टी सहकारात होऊ नये, हा आमचा दृष्टिकोण आहे."

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी कासव गतीने

Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा

Agriculture University: शिर्के प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे कृषिशास्त्रज्ञांचे लक्ष

Pomegranate Prices: डाळिंबाला किलोला १२० ते १६० रुपये दर

Farmer Suicides: बीड जिल्ह्यात दर ३६ तासाला एका शेतकरी आत्महत्येची नोंद

SCROLL FOR NEXT