Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University Land: कृषी विद्यापीठांच्या ३५ हजार एकर जमिनी चारा लागवडीसाठी वापरणार!

Agriculture Minister Manikrao Kokate: महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये पडून असलेल्या ३५ हजार एकर शेतीचा उपयोग आता चारा लागवडीसाठी केला जाणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करत, शेतकऱ्यांना त्यांच्या डेमोसाठीही या जमिनी उपलब्ध करून द्याव्यात, असे मत व्यक्त केले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News: ‘‘राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ३५ हजार एकरांवर शेती पडून आहे. त्यावर चारा लागवड करून तो चारा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. शेतकऱ्यांची इच्छा असेल तर ही पडीक शेती त्यांना डेमोसाठी दिली पहिजे,’’ असे वक्‍तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्‍त सहकार्याने सायन्सकोर मैदानावर कृषी विकास परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.१४) कृषिमंत्री श्री. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे (पाटील), राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा सल्लागार समिती सदस्य नरेंद्र शिंगणे यांची या वेळी उपस्थिती होती.

श्री. कोकाटे म्हणाले, की कृषी विद्यापीठांना मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यांनी यावर संशोधन करावे, असा त्यामागे उद्देश होता. परंतु आज कृषी विद्यापीठाऐवजी शेतकरीच कमी खर्चाचे तंत्रज्ञान स्वतःपुरते विकसित करीत आहे. त्याला जुगाड तंत्रज्ञान म्हटले जात असले, तरी त्याची उपयोगिता अधिक आहे.

त्यामुळे कृषी विद्यापीठाकडे असलेली पडीक जमीन निदान चारा लागवडीसाठी उपयोगात आणली पाहिजे. हा चारा गरजू पशुपालकांना उपलब्ध करून दिला तरी त्यातून शेतकऱ्यांचेच हित साधले जाणार आहे. शेतकऱ्यांची मागणी असेल तर कृषी विद्यापीठांनी अशी पडीक जमीन शेतकऱ्यांना त्यांचे प्रयोगाचे डेमो सादरीकरणासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही श्री. कोकाटे म्हणाले.

‘‘शेतीत कामासाठी मजुरांच्या उपलब्धतेची मोठी अडचण असून वातावरणातील बदलाचे देखील मोठे आव्हान शेतीसमोर आहे. त्यामुळेच नुसते शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे,’’ असेही कृषिमंत्र्यांनी या वेळी बोलाताना सांगितले.

‘तालुकास्तरावरही कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावे’

‘‘राज्यात आतापर्यंत सहा ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती आणि प्रोत्साहन मिळत असल्याने जिल्हाच नाही तर तालुकास्तरावर अशाप्रकारच्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे,’’ असे निर्देश कृषी विभागाला दिले जातील, असेही माणिकराव कोकाटे या वेळी बोलताना म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT