Flood Affect Area Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Flood Affect Area Kolhapur : ३३ पथके १०० कर्मचारी, ४०० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण

sandeep Shirguppe

Kolhapur Flood : पंचगंगा, भोगावती नदीच्या काठावरील करवीर तालुक्यात अतिवृष्टी व महापुराने घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिल्यानंतर आज तालुक्यातील सुमारे ४०० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले. एका आठवड्याची पंचनामे पूर्ण करण्याची डेडलाईन असल्यामुळे ३३ पथके आणि १०० कर्मचारी पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.

शहरासह करवीर तालुक्यातील पंचगंगा, भोगावती नदीच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक घरे व कुटुंबांना फटका बसला आहे. चार दिवस पुराचे पाणी घरामध्ये होते. तसेच आजही पुराचे पाणी शेतातील पिकात आहे. यामुळे शेतकरी, नागरिकांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका व करवीर तहसीलदार महसूल विभागाच्या वतीने ३३ पथके निर्माण केली असून, यामध्ये १०० कर्मचारी काम करत आहेत.

घरामध्ये पुराचे पाणी जाणे, घराची पडझड होणे, गोठ्याची पडझड आणि दुकानांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी पुराचे पाणी गेलेले असे चार प्रकारचे पंचनामे केले जात आहेत. तसेच नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्यासाठी टेक्निकल अभियंते या पथकामध्ये काम करत आहेत.

काल(ता.३०) एका दिवसात शहरासह तालुक्यात व्यावसायिक दुकानात पाणी गेलेले, पडझड झालेली, तसेच गोठा पडझड झालेले असे सुमारे चारशे पंचनामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती तहसीलदार सूत्रांनी दिली.

दरम्यान, तालुक्यात सुमारे ३०० च्यावर घरांच्या भिंती पडल्याचा अंदाज आहे. तसेच सुमारे ६०० हेक्टरहून अधिक पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. अद्याप पिकांमध्ये पुराचे पाणी आहे. यामुळे पिकाचा पंचनामा करणे शक्य नाही. पूर ओसरल्यानंतर पंचनामा केला जाणार आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, २०१९, २०२१ आणि २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘महसूल व महापालिकेचे कर्मचारी यांची पथके तातडीने, युद्धपातळीवर पंचनामे करत आहेत. आज सुमारे ४०० पंचनामे पूर्ण झाले आहेत. एका आठवड्याच्या आत सर्व पंचनामे पूर्ण केले जाणार असून, शेती पिकाचे पंचनामे पूर ओसरल्यानंतर केले जाणार असल्याची माहिती करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.

शहरातील ५०० मिळकतींचे पंचनामे पूर्ण

महापुराचे पाणी आल्याने नुकसान झालेल्या शहरातील सुमारे ५०० मिळकतींचे पंचनामे आज प्रशासनाने पूर्ण केले. यामध्ये घरे, दुकाने, गोठा यांचा समावेश आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने शहरातील विविध भागांत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शहरातील सुमारे एक हजार ८० नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पुराचे पाणी ओसरल्याने हे सर्व पूरग्रस्त नागरिक आपल्या घरी परतले.

त्यानंतर महसूल विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली. महापालिका अधिकारी, तलाठी आणि आय.टी.आयचे कर्मचारी अशा सुमारे १७० कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले. यामध्ये ज्या घरांमध्ये पुराचे पाणी आले. ज्यांच्या गोठ्यात पाणी शिरले, त्यांचे पंचनामे झाले. पडझड झालेल्या घरांचे मूल्यमापन आय.टी.आयच्या कर्मचाऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT