Santosh Deshmukh  Agrowon
ॲग्रो विशेष

Santosh Deshmukh Case : राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती पुढील तीन दिवस बंद; संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायतींचे आंदोलन

Gram Panchayat Bandh : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींनी आंदोलन पुकारले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Beed Sarpanch Murder Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २३ दिवस होत आहेत. अद्याप आरोपींचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींनी आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. यामुळे तब्बल २८ हजार ग्रामपंचायतींचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. दरम्यान आज (ता.३१) धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड सीबीआय पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हेच मास्टरमाइंड असल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांसह देशमुख यांच्या कुटुंबियांनी केला होता. पण कराड यांच्यासह तीन आरोपी फरार आहेत. यामुळे राज्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता. पण आता ७ दिवसांचे सरकारला अल्टिमेटम देताना राज्यभरातील ग्रामपंचायतींनी कामकाज बंद आंदोलन छेडले आहे. जे आजपासून पुढील तीन दिवस असणार आहे.

राज्यभरात काम बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कारवाई व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात २७,९५१ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत.

या जिल्ह्यांचा सहभाग नाही

दरम्यान, ग्रामपंचायतींनी पुकारलेल्या निषेध मोर्चात सांगली, सातारा, कोल्हापुरातील ग्रामपंचायती सहभागी झालेल्या नाहीत. तर देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटनांनी ९ जानेवारीला बंद पुकारण्याचा निर्धार केला आहे.

नेमकी मागणी काय?

सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील एका सरपंचावर प्राणघातक हल्ला झाला होता. यामुळे सरपंच संघटना आक्रमक झाल्या असून शासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी संघटनांनी केली आहे.

तर सरपंचांचा सुरक्षेसाठी कायदा करावा, देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना तातडीने अटक करत मास्टर माईंडचा शोध घ्यावा, सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या सरपंच संघटनांनी केल्या आहेत. याबाबतचे निवेदनही महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT