MGNREGA  Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA : ‘मनरेगा’तून २६३ विहिरी, तर ४७५ गोठ्यांची उभारणी

Rural Development Scheme : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल २६३ विहिरी खोदाई आणि पावणेपाचशे गोठ्यांची उभारणी सुरू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल २६३ विहिरी खोदाई आणि पावणेपाचशे गोठ्यांची उभारणी सुरू केली आहे. ‘मनरेगा’चा लाभ घेऊन युवा शेतकरी शेतीत क्रांती घडवू लागला आहे.

आटपाडी तालुक्यात सहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याच्या जोडीला खात्रीशीर टेंभू सिंचन योजनेचे पाणी गावोगावी आले आहे. त्यामुळे बागायत क्षेत्रात वाढ होत चालली आहे. डाळिंब, आंबा, नारळ यांसारख्या फळांपिकाखालील क्षेत्र वाढत आहे. तसेच भाजीपाला, मका, ऊस याकडेही शेतकरी वळला आहे.

अलीकडे पाणी आल्यापासून तरुण पिढी मोठ्या संख्येने शेतीत उतरली आहे. त्यांच्याकडून शेतात विविध प्रयोग सुरू आहेत. या तरुण शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांचे मित्र, नातेवाईक आणि गावातील अन्य तरुणही शेतीकडे वळू लागले आहेत.

नव्यानेच शेतीत प्रवेश करणारे, तसेच बागायत क्षेत्रात वाढ करत चाललेल्या तरुणांनी शाश्वत सिंचनासाठी विहीर खोदाईकडे मोर्चा वळवला आहे. ओढे, नाले, तलावात पाणी असले तरी स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी विहीर खोदाई केली जाते. टेंभूचे आलेले पाणी आणि वाढलेला पाऊस यामुळे विहिरींनाही अपेक्षित पाणी लागते.

सध्या आटपाडी तालुक्यात विक्रमी २६३ विहीर खोदाईची कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सुरू आहेत. त्यासाठी तब्बल चार लाख रुपये अनुदान मिळते. यातून पन्नास फूट विहीर खोदाई आणि कठड्याचे बांधकाम केले जाते.

लाभार्थी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीकडे विहीर खोदाईसाठी प्रस्ताव पाठवतात. तेथून स्थळपाहणी करून खोदाईसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली जाते. खोदाईचे काम सुरू केल्यानंतर मजुरांच्या जॉब कार्डवर बँकेत मजुरी जमा केली जाते. तसेच इतररी आणि कुशलचा धनादेश काढला जातो. प्रत्येकाचे नवीन घर आणि विहीर खोदाईचे स्वप्न असते.

‘मनरेगा’मुळे विहीर खोदाईचे स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले आहे. याशिवाय तालुक्यातील युवा शेतकरी पाण्यामुळे चारा उपलब्ध झाल्यामुळे पशुपालनाकडे वळला आहे. त्यांच्या व्यवसायालाही प्रोत्साहन देण्यासाठी ‘मनरेगा’तूनच शासनाने गोठा बांधणीसाठी ८० हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे.

आटपाडी तालुक्यात ‘मनरेगा’तून तब्बल ४७५ गोठ्यांची उभारणी सुरू आहे. गोठा उभारणीसाठी असलेल्या पाच जनावरांची अट पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना मंजुरी मिळते. एकंदरीत, ‘मनरेगा’तून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने २६३ विहीर खोदाई आणि ४७५ गोठ्यांची उभारणी सुरू केली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात मोठा बदल दिसू लागला आहे.

सध्या ‘मनरेगा’तून २६३ विहिरी आणि ४७५ गोठ्यांची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाने आणलेली ही योजना चांगली आहे. तरुण शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावे.
- संदीप भंडारे, गटविकास अधिकारी, आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT