Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: पीकविम्याचे १७०२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात येणार

Farmers’ Relief Package: खरिप हंगाम २०२४ मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली. आतापर्यंत शेतकऱ्यांना ३ हजार १७५ कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे. त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ४७३ कोटी रुपये जमा केले.

Anil Jadhao 

Pune News: खरिप हंगाम २०२४ मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली. आतापर्यंत शेतकऱ्यांना ३ हजार १७५ कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे. त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ४७३ कोटी रुपये जमा केले. तर १ हजार ७०२ कोटी रुपयांची भरपाई विमा कंपन्यांकडे प्रलंबित आहे. ही भरपाई विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात जमा करतील, असे कृषी विभागाने सांगितले. 

राज्यात खरिप हंगाम २०२४ मध्ये एकूण ९ कंपन्यांनी विमा योजना राबविण्याचे काम केले. शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसानीच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर नुकसानीचे पंचनामे करून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई निश्चित केली आहे. तसेच पीक कपनी प्रयोगावर आधारित भरपाई देखील कंपन्यांनी निश्चित करण्याचे काम सुरु केले, असेही कृषी विभागाने सांगितले. 

पीकविम्याच्या नियमानुसार राज्य आणि केंद्र सरकारने आपल्या हिस्स्याच्या विमा हप्ता दिल्यानंतरच विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रीगरअंतर्गत निश्चित नुकसान भरपाई देतात. केंद्र सरकार आपल्या हिस्याचा विमा हप्ता लवकर जमा करते. मात्र राज्य सरकारच्यावतीने उशीर होतो. केंद्र आणि राज्याचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून मिळणारी भरपाई कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात. तर दुसरा हप्ता मिळाल्यानंतर काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जमा करण्याची तरतूद आहे. 

राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला. त्यामुळे विमा कंपन्या आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून मिळणारी भरपाई शेतकऱ्यांना देत आहेत. भरपाई जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत संथ आहे. रब्बी हंगाम संपला असताना खरिपातील भरपाई निश्चित करण्याचे काम सरु आहे. १७ एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून ३ हजार १७५ कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली. पुढील काळात यात आणखी वाढ होऊ शकते, असेही कृषी विभागाने सांगितले. 

१७ एप्रिलपर्यंत निश्चित झालेल्या ३ हजार १७५ कोटी रुपयांपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ४७३ कोटी रुपये जमा झाले. तर उरलेले १ हजार ७०२ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले.  काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई निश्चित करण्याचे काम सुरु आहे. ही भरपाई लवकरच निश्चित होईल. तसेच राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन ट्रीगरमधून निश्चित झालेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT