Kolhapur News : जिल्ह्यातील कसदार जमीन आणि हवामान ऊस शेतीला लाभदायक आहे. ऊस शेतीला शास्त्र व अनुभवाची जोड दिल्यास एकरी १०० टन उत्पादन सहज गाठता येऊ शकते. उत्पादकता वाढवली तरच शेती फायद्याची होणार, अन्यथा केवळ कष्ट केल्याचे मानसिक समाधान होईल. व्यवसाय म्हणून फायदा होणार नाही, असे मत कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी व्यक्त केले.
वाकरे (ता. करवीर) येथे कृषी विभाग व इंडियन फारमर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह यांच्यातर्फे आयोजित नॅनो खते ऊस पीक परिसंवादात परीट बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी पाटील होत्या. यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक अनिल पाटील, प्रा. बी. बी. पाटील, उपसरपंच अमर करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी उपसंचालक परीट म्हणाले, की देशात शेती व पीक यावर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधन संस्था आहेत; पण यातील संशोधन व शास्त्र शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नसल्याने शेतकरी जमिनीच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या केवळ ५० टक्केच उत्पादकतेपर्यंत पोहोचला आहे. केवळ शास्त्रावर शेती करता येणार नाही.
त्याला मनुष्यबळ व भांडवलाची आवश्यकता आहे. डॉ. एम. एस. पोवार म्हणाले, की भारत स्वतंत्र झाला त्यावेळी संपूर्ण देशात दोन लाख टन खताचा वापर होत होता. आज एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात त्याच्या दुप्पट साडेचार लाख टन खते वापरली जात आहेत. या रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत ढासळल्याने जमीन खतांना प्रतिसाद देत नाही.
यासाठी नॅनो खताकडे वळावे.विजय बुनगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मनमोहन कलंत्री, डॉ. एन. जी. जांभळे यांनी शेती व खत व्यवस्थापनावर माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, यशवंत बँकेचे संचालक कुंडलिक पाटील, भगवंत पाटील, हिंदुराव तोडकर, सुरेश करपे, सर्जेराव शिंदे, परसू कांबळे उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.