Water Shortage
Water Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : वन्यप्राण्यांनाही पाणीटंचाईच्या झळा

Team Agrowon

Water Shortage Alibaug उन्हाच्या झळांमुळे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर होत आहे. यातून जंगलात राहणारे प्राणीही (Wild Animal) वाचू शकलेले नाहीत. जिल्ह्यात कर्नाळा पक्षीअभयारण्य आणि फणसाड अभयारण्य आहेत, यासह जंगलाने व्यापलेल्या क्षेत्रही मोठे आहे. जलस्रोत आटू लागल्याने वन विभागाने परिसरात स्वच्छतेसह कृत्रीम पाणवठे तयार केले आहेत.

उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटतात, यामुळे मे-जून महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते, याचा सर्वाधिक फटका प्राण्यांना बसतो. घशाला कोरड पडत असल्‍याने प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्‍तीत शिरतात.

यात काही प्राण्यांची शिकार केली जाते. तर बिबट्यासारख्या हिंस्र पशू माणसांवर हल्‍लेही करतात. त्‍यामुळे वनविभागाकडून वन्यजीवांसाठी जलस्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. वनरक्षकांकडून नैसर्गिक पाणवठ्यांसह नाले व कृत्रिम तलावांच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे.

गवत खाणाऱ्या प्राण्यांना सर्वाधिक फटका

सह्याद्रीच्या पट्ट्यात रानडुक्कर, तरस, सांबर, भेकर, ससे, कोल्हे, बिबट्यांचा वावर जास्त आहे. पाण्याच्या शोधात पक्षी काही किलोमीटरचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतात, परंतु पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका प्राण्यांना बसतो. सुके गवत खाल्ल्‍यावर तहान भागवण्यासाठी लोकवस्तीत प्राणी शिरतात.

पाण्यासाठी वणवण थांबणार

पाण्यासाठी वन्यजीव भटकंती करीत असल्‍याने, कधी कधी रस्ते ओलांडताना किंवा मानवी वस्तीत प्रवेश केल्याने त्यांना जीवही गमवावा लागतो. अनेक वेळा तहानेने व्याकूळ झालेले प्राणी विहिरीत पडण्याच्याही घटना घडल्‍या आहेत.

फणसाड वनक्षेत्रात पाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत आहेत. त्‍यांची साफसफाई करून प्राण्यांना पुरेसा पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी पाणवठे पूर्णपणे आटले आहेत, त्या ठिकाणी सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

पाण्यासाठी वणवण थांबणार

पाण्यासाठी वन्यजीव भटकंती करीत असल्‍याने, कधी कधी रस्ते ओलांडताना किंवा मानवी वस्तीत प्रवेश केल्याने त्यांना जीवही गमवावा लागतो. अनेक वेळा तहानेने व्याकूळ झालेले प्राणी विहिरीत पडण्याच्याही घटना घडल्‍या आहेत.

फणसाड वनक्षेत्रात पाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत आहेत. त्‍यांची साफसफाई करून प्राण्यांना पुरेसा पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी पाणवठे पूर्णपणे आटले आहेत, त्या ठिकाणी सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT