Atul Benke  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाबाबत रस्त्यावर उतरू

Team Agrowon

Pune News : कुकडी प्रकल्पातील धरणांनी तळ गाठला आहे. ही परिस्थिती समजून न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवर्तन कालावधी वाढविण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत वेडावाकडा निर्णय घेऊ देणार नाही.

या निर्णयाच्या विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, संघर्ष करावा लागेल, पोलिसांनी भले आम्हाला अटक करू दे. नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या मारू देत. यासाठी आमची तयारी आहे, असा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाचा कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घेतला आहे. वाढविलेला आवर्तन कालावधी सुरळीत होण्यासाठी पोलिस दलाचे संरक्षण घेऊन कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव सं. मा. सांगळे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला आहेत.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी (ता.२३) विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांनी शेतकऱ्या समवेत येथील कुकडी पाटबंधारे विभागाला निवेदन दिले.

याबाबतचे निवेदन त्यांनी येथील उपकार्यकारी अभियंता राजेंद्र रावळे यांना दिले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, शरद लेंडे, गुलाब नेहरकर, शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, बाजीराव ढोले यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुद्धा कुकडीच्या पाणी प्रश्नाबाबत पुणे आणि नगर जिल्ह्याचे भांडण होऊ दिले नाही की राजकारण केले नाही. पाणी सर्वांना मिळावे असे आम्ही यापूर्वी नियोजन करत आलो आहोत. कधीही अडचण निर्माण झाली नाही. हक्काच्या पाणी प्रश्नाबाबत संघर्ष करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.

जून महिना संपत आला पाऊस नाही, पेरण्या नाही. पाणी नसेल तर ऊस लागवड कमी होऊन कारखाने अडचणीत येतील. उसाला भाव देता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यकर्त्यांना भेटून परिस्थिती समजून सांगू.जर त्यांनी ऐकले नाही तर संघर्ष करण्याची आमची तयारी आहे, असा इशारा यावेळी वळसे पाटील यांनी दिला.

जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील नदीवर असणाऱ्या ६५ कोल्हापूर बंधाऱ्यांत यापुढे धरणातून व कालव्यातून पाणी सोडता येणार नाही, असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला आहे. यामुळे बंधारे कोरडे राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यकाळात धरणे असूनही या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. परिस्थिती बदलण्यासाठी उठाव करावाच लागेल. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे.
- अतुल बेनके, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT