Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Water Project : जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प रुतले गाळात

एकीकडे तापी आणि गिरणा धरणांवरील प्रकल्प निधीअभावी रखडल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर दुसरीकडे जे मोठे प्रकल्प आहेत तेच गाळात अडकल्याचे चित्र आहे.

टीम ॲग्रोवन

भडगाव, जि. जळगाव : एकीकडे तापी आणि गिरणा धरणांवरील प्रकल्प (Water Project) निधीअभावी रखडल्याने पावसाळ्यात पाणी (Water Wastage) वाहून जाते, तर दुसरीकडे जे मोठे प्रकल्प आहेत तेच गाळात अडकल्याचे चित्र आहे. त्यामुळे आहे त्या प्रकल्पातही पूर्ण क्षमेतेने पाणी अडविले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.

‘हतनूर’मध्ये क्षमतेच्या ५० टक्के, तर गिरणा प्रकल्पात सात टक्के एवढा गाळ साचलेला आहे. त्यामुळे वाया जाणारे पाणी अडविण्याचे दूरच; परंतु साचलेल्या गाळाचा उपसा केव्हा होईल, हा खरा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यातून तापी आणि गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांवरच जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मात्र प्रमुख नद्यांवर २५-३० वर्षांपासून मंजूर प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहेत. त्यामुळे दर वर्षी पावसाळ्यात पाणी वाया जाते. पण दुसरीकडे ज्या प्रकल्पात पाणी अडविले जाते, तेही गाळात अडकले असल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे पाणी असूनही धरण पूर्ण क्षमेतेने भरत नसल्याचे चित्र आहे.

‘हतनूर’मध्ये ५० टक्के गाळ

हतनूर धरणाची एकूण क्षमता ३८८ दलघमी एवढी आहे. यंदा धरणातून तब्बल दहा हजार ९५ दलघमी एवढे पाणी ‘ओव्हर फ्लो’ झाले. तर धरणात सद्यःस्थितीत क्षमतेच्या पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक गाळ असल्याचे चित्र आहे. गिरणा धरणात हतनूर इतका नाही, पण त्या खालोखाल गाळ असल्याचे दिसते. गिरणा धरणाच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यःस्थितीत धरणात सात टक्के एवढा गाळ आहे. त्यामुळे मृतसाठा हा पूर्णतः गाळात अडकला आहे. २०१६ मध्ये तर दुष्काळसदृश परिस्थितीत मृत साठ्यातून पाणी उपसण्याची वेळ आली होती.

गाळ केव्हा उपसला जाईल?

एकीकडे निधीअभावी तापी आणि गिरणा नदीवर प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे पाणी अडविले जात नाही. पण दुसरीकडे गाळाअभावी प्रकल्पात पूर्ण क्षमेतेने पाणी साठवता येत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाचा उपसा केव्हा होईल, असा प्रश्‍न आता विचारला जात आहे. प्रकल्पासाठी मोठा निधी लागणार आहे. पण थोड्याफार निधीवर गाळाचा उपसा होऊन धरणाची साठवण क्षमता वाढणार आहे. ते विचारात घेऊन किमान शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Car Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, २४ जखमी, हाय अलर्ट जारी

Sugarcane Farming: अहिल्यानगरला चौतीस हजार हेक्टरवर ऊस लागवड

NCP Alliance Local Polls: मुश्रीफांनी 'भाजप'चा डाव ओळखला, मध्यस्थी करत दोन्ही राष्ट्रवादींना आणले एकत्र

Rabi Sowing: रब्बीची ५३ हजार ९६० हेक्टरवर पेरणी

MSP Registration: बायोमेट्रिक नोंदणीच्या नावावर शेतकऱ्यांचा नाहक छळ

SCROLL FOR NEXT