Jaggery Market Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात माथाडी मजुरीप्रश्‍नी तोडगा नाहीच; चर्चा फिसकटली

बाजार समितीत गुरुवारी (ता. ५) गूळ सौदे बंदचा प्रश्‍न कायमच राहिला. माथाडी कामगारांच्या मागण्यांवर सलग तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही.

Team Agrowon

कोल्हापूर ः बाजार समितीत गुरुवारी (ता. ५) गूळ सौदे (Jaggery Market) बंदचा प्रश्‍न कायमच राहिला. माथाडी कामगारांच्या मागण्यांवर (Labor Demand) सलग तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात दुपारी बैठक झाली.

त्यातही माथाडी कामगार आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तिसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा निघू शकला नाही. परिणामी, व्यापारी व शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत शुक्रवार (ता. ६)पासून बाहेरचे माथाडी आणून काम सुरू करण्याचा इशारा दिला.

माथाडी कामगारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे तिसऱ्या दिवशीही यार्डातील गूळ सौदेस्थळी शुकशुकाट होता. चार दिवसांपूर्वी उपस्थित झालेला मजुरीवाढीच्या मागणीसाठी बुधवारी (ता. ४) दुपारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या कक्षात बैठक झाली होती. त्यात ५० टक्के मजुरीवाढ देण्याच्या मागणीवर माथाडी कामगार ठाम राहिले, तर व्यापाऱ्यांनी मजुरीवाढ देण्यास नकार देताच बैठक फिसकटली.

त्याच वेळी उपजिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक झाली. या बैठकीला शेतकरी व्यापारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आलेला गूळ माथाडी उतरून घेतात.

त्या माथाडींना व्यापारी व अडते मजुरी देतात. बाजारपेठेत आलेला गूळ उतरवणे, वजन करणे, थप्पीला लावणे अशी कष्टाची कामे आम्ही करतो. त्या तुलनेत आम्हाला मजुरी कमी मिळते. यापुढील कामासाठी आम्हाला ५० टक्के मजुरीवाढ द्यावी, असा मुद्दा माथाडींनी मांडला.

यावर व्यापाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आम्ही गुळाचा व्यवसाय नगण्य नफ्यात करतो आमचा गूळ वेळेत गुजरातला पोहोचला नाही, तर आमचेही नुकसान होते. गूळ बाजारपेठेत स्पर्धा वाढली आहे, गुजरातमधून गुळाची मागणी कमी होत आहे.

वाहतुकीचे भाडे, गोदाम भाडे वाढते, शेतकऱ्यांना दरही चांगला देतो, तरीही आम्ही माथाडी कामगारांना राज्यभरातील बाजारपेठेतील मजुरीपेक्षा जास्त मजुरी आम्ही कोल्हापुरात देतो. यापूर्वीच आम्ही मजुरीवाढ दिली आहे, यापेक्षा जास्त मजुरी देणे आम्हाला परवडत नाही.

असे ठामपणे सांगितले. तसेच तुम्ही अचानकपणे सौदे बंद केल्याने आमचेही नुकसान झाले त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रति प्रश्‍नही केला.

‘सौदे सुरू ठेवून मजुरीवर चर्चा करा’

सौदे बंदबाबत शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. दर आठ पंधरा दिवसाला सौदे बंद करता, तुम्ही सौदे बंद केले, तरी आम्हाला गुळाचे उत्पादन घ्यावे लागते. उत्पादित गुळाचे सौदे झाले नाही, तर आमचा गूळ पडून राहतो. यात आमचे नुकसान होते. त्यामुळे सौदे सुरू ठेवून मजुरीवर चर्चा करा, अगोदर सौदे सुरू करा, असे आवाहन केले.

पोलिस बंदोबस्तावर विचार विनिमय

उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनीही तोडगा निघेपर्यंत सौदे सुरू ठेवा, असे आवाहन केले; मात्र माथाडी कामगारांनी कोणाचेही म्हणणे जुमानले नाही. तेव्हा बाजार समितीने उद्यापासून पोलिस बंदोबस्त द्यावा. बाहेरचे माथाडी आणून काम सुरू करण्याबाबत व्यापारी, अडते, शेतकऱ्यांनी विचार विनियम सुरू केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT