Water Storage
Water Storage  Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage : वीस दिवसांत सोळा टीएमसी पाण्याचा वापर

Team Agrowon

पुणे : चालू जानेवारी महिन्यात रब्बी हंगामासाठी (Rabi Irrigation) धरणांतून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असल्याने पाणीपातळीत (Water Level) हळूहळू घट होत आहे.

वीस दिवसांत १६.२२ टीएमसी एवढ्या पाण्याचा वापर झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी (Water Demand) वाढल्यास साठ्यात आणखी घट होणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यात ३ जानेवापर्यंत जवळपास १९.९८ टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. त्यावेळी जिल्ह्यातील २६ धरणांत एकूण १८२.६९ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.

त्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, सूर्यफूल, ज्वारी अशा विविध पिकांसाठी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने ११ धरणांतून पाण्याचे आवर्तन सोडले. त्यामुळे वेगाने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, विसापूर, उजनी या धरणांतून रब्बी हंगामासाठी कालव्याला पाण्याचे आर्तन सोडण्यात आले आहे.

यामध्ये खडकवासला धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला १५०५ क्युसेक, चासकमान धरणातून ५५० क्युसेक, वीर २३७७, येडगाव १४००, डिंभे ८००, घोड ४७०, विसापूर ८०, उजनीतून १३४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडले आहे.

त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी होत असून, वीस दिवसांत १६.२२ टीएमसी एवढ्या पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्याचा विचार करता जलसंपदा विभागाला आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. पावसाळ्यात धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यातच परतीच्या पावसानेही चांगलीच दाणादाण उडवल्याने धरणांतील पाणी पातळीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाली होती.

मुठा खोऱ्यातील टेमघर, खडकवासला या धरणांतील पाणीसाठा कमी-अधिक असून वरसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली होती.

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, वडिवळे वगळता कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली होती. कुकडी खोऱ्यातील

पिंपळगाव जोगे, माणिकडोह वगळता येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड ही धरणेसुद्धा शंभर टक्के भरली होती. मुळशी, विसापूर या धरणांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून उजनी धरणांत शंभर टक्क्यांहून अधिक म्हणजेच १११ टक्के पाणीसाठा झाला होता.

धरणनिहाय असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये :

टेमघर १.१८, वरसगाव १०.६४, पानशेत ८.५२, खडकवासला १.६५, पवना ५.८२, कासारसाई ०.४२, कळमोडी १.४८, चासकमान ६.०३, भामा आसखेड ६.३२, आंद्रा २.४९, वडिवळे ०.८४, शेटफळ ०.५३, नाझरे ०.५१, गुंजवणी ३.३३, भाटघर १९.७३, नीरा देवघर १०.८३, वीर ५.८६, पिंपळगाव जोगे २.८८, माणिकडोह ६.९९, येडगाव १.७५, वडज ०.९३, डिंभे १०.०४, चिल्हेवाडी ०.६४, घोड ३.७८, विसापूर ०.७८, उजनी ५२.५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT