Raju Shetti, Nitin Gadkari Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti Meets Nitin Gadkari : राजू शेट्टींनी घेतली नितीन गडकरींची भेट, साखर निर्यात धोरणावर निर्णय घेण्याची मागणी

Sugarcane Farmer : साखर उद्योगाबरोबर, राष्ट्रीय महामार्गांचे सुरू असलेली कामे व राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

Team Agrowon

Maharashtra Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन साखर उद्योगाबरोबर, राष्ट्रीय महामार्गांचे सुरू असलेली कामे व राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

देशामध्ये ऊस उत्पादक शेतकरी वगळता केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस, कांदा, धान उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत सरकारने योग्य ती धोरणे आखून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, गडकरी यांच्या विशेष प्रयत्नामुळे केंद्र सरकारने इथेनॅालचे धोरण स्थिर केल्यामुळे साखर कारखानदारांना थोडे चांगले दिवस आले आहेत. देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करून इथेनॅालच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.

तसेच सांगली, कोल्हापूर बायपास मार्गे चौपदरीकरण करताना मुरमाचा भराव टाकू नये, अन्यथा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावे महापुराच्या पूर्ण विळख्यात जातील. त्यामुळे सदर रस्ता करताना पिलरचा वापर करून रस्ता करावा, अशी मागणी देखील यावेळी केली.

वाढलेल्या महागाईमुळे उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेली असून यंदा एफआरपी पेक्षा वाढीव दर दिल्याशिवाय हा उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे. याकरिता साखरेचा बाजारातील किमान दर ३८ रूपये करून साखर निर्यात धोरण निश्चित करण्याची गरज आहे.

देशात पामतेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. याचा विपरीत परिणाम सोयाबिनच्या दरावर होत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या सोयाबिन उत्पादित होत असलेल्या भागात होत आहेत. तसेच सोयाबिनच्या पेंडीच्या आयातीवर देखील निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.

याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी - कोल्हापूर ते अंकली व पुणे- कागल या महामार्गातील रस्त्याच्या कामातील त्रुटीबाबत व सुरू होत असलेल्या कामामुळे संभाव्य महापुराच्या परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच अंकली कोल्हापूर बायपास मार्गे चौपदरीकरण करताना भराव न टाकता पिलर उभे करून रस्ते तयार केले जातील, असेही त्यांनी आश्वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT