Panchganga River Pollution Agrowon
ताज्या बातम्या

Panchganga River Pollution: नदी प्रदूषणाविरुद्ध किसान सभेची निदर्शने

कारखान्यांतून निघणारे रसायन नदीत मिसळणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून दूषित मैला मिश्रित गटारीचे पाणी मिसळत आहे.

Team Agrowon

कोल्हापूर : पंचगंगा व इतर नद्यांमधील प्रदूषण (Panchganga River pollution ) वाढून पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येत आहे. शिवाय कोल्हापुरातील (Kolhapur) लोकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.

या प्रकरणी वेळोवेळी निवेदन देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Pollution Control Board) दुर्लक्ष झाले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटीस काढते.

त्यामुळे प्रदूषण करणारे कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था निर्ढावलेल्या आहेत, आशा घोषणा देऊन किसान सभेने प्रदूषण मंडळाचा निषेध केला.

विविध अभ्यास संस्था व पर्यावरण तज्ज्ञांनी काढलेल्या निकषानुसार या प्रदूषणास कारखान्यांतून निघणारे रसायन नदीत मिसळणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून दूषित मैला मिश्रित गटारीचे पाणी मिसळत आहे.

तसेच मासेमारीच्या तंत्रातील त्रुटी याही कारणीभूत आहेत. पंचगंगा व इतर नद्या प्रदूषणास कारणीभूत असलेले कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर घटक यांच्यावर कारवाई करावी.

कारखाने व स्थानिक संस्थांच्या वीज तोडणी त्यांच्या अधिकाऱ्यावर गुन्हे करावेत दंड ठोठावून त्यांच्या वैयक्तिक पगारातून तो वसूल करावा, पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नावर श्वेतपत्रिका काढावी.

पंचगंगेतील प्रदूषणमुक्ती अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. जिल्हा किसान सभेचे सचिव नामदेव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गिरीश फोंडे, जिल्हा अध्यक्ष वाय. एन. पाटील, दिनकर सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kerala Assmbly : व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा योजना लागू करा; केरळ विधानसभेत ठराव मंजूर

Post Harvest Value Addition: कर्नाटकात भात पीक काढणीपश्चात मूल्यवर्धनाचं मॉडेल, चार-पाच पट अधिक उत्पन्नाची हमी

Rural Governance: गावगाड्याचा विकास कधीपर्यंत वाऱ्यावर?

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

SCROLL FOR NEXT