Kisan Long March Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Long March : राज्यभरातील शेतकरी काढणार अकोले ते लोणी ‘लाँग मार्च’

शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोले ते महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे गाव असलेल्या लोणी (ता. राहाता) असा तीन दिवसांचा शेतकरी पायी ‘लाँग मार्च’ काढणार आहेत.

Team Agrowon

Nagar News : शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्‍नांकडे (Farmers Issue) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोले ते महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांचे गाव असलेल्या लोणी (ता. राहाता) असा तीन दिवसांचा शेतकरी पायी ‘लाँग मार्च’ (Kisan Long March) काढणार आहेत.

अखिल भारतीय किसान सभा या लाँग मार्चचे नेतृत्व करणार आहे. या लाँग मार्चसंदर्भात बैठका घेऊन नियोजन केले जात आहे, असे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढला होता.

त्यानंतर आता २४ ते २६ एप्रिल या काळात अकोले ते लोणी, ता. राहाता (महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे गाव) येथे शेतकरी पायी लाँग मार्च काढणार आहेत.

याही लाँग मार्चमध्ये राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार असून, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांच्याससह किसान सभेचे प्रमुख पदाधिकारी नेतृत्व करतील, असे सांगून किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, की राज्यातील देवस्थानच्या शेतजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, अशी आमची मागणी आहे.

काही दिवसांपूर्वी काढलेल्या लाँग मार्चनंतर सरकारने त्या संदर्भात कायदा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. कायदा होईल, परंतु तो जर विश्‍वस्तांच्या बाजूने झाला तर पुन्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे कायदा करताना शेतकऱ्यांचे म्हणणेही एकून घेतले पाहिजे.

नगर जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेती संदर्भातील अनेक प्रश्‍न आहेत. रखडलेल्या प्रश्‍नांना न्याय मिळावा यासाठी हा लाँग मार्च काढला जाणार असून त्यासाठी बैठका घेऊन तयारी सुरू आहे, असे सांगण्यात आले.

दुधासंदर्भात गांभीर्याने घेतले पाहिजे

डॉ. अजित नवले यांनी दूध उत्पादकांबाबत सरकार फारसे गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप केला. ‘महानंद’ बरखास्त करणे म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. दुधाला ‘एफआरपी’ मिळावी ही जुनी मागणी आहे. त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत. दूध व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे दुधाचा प्रश्‍न सुटला पाहिजे. दुधासंदर्भात गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे डॉ. नवले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT